AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेस आणि शरद पवार गटाला किती जागा मिळणार?; शरद पवार यांनी सांगितलेला अंदाज काय?

संकटकाळात उद्धव ठाकरेंना मदत करणारा पहिला माणूस मी असेन, असे मोदी म्हणाले. त्यावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी लाख म्हटलं असेल, पण मोदींची मदत घेण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर कधीच येऊ नये असं शरद पवार म्हणाले.

काँग्रेस आणि शरद पवार गटाला किती जागा मिळणार?; शरद पवार यांनी सांगितलेला अंदाज काय?
| Updated on: May 04, 2024 | 12:04 PM
Share

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकासा आघाडीच्या नेत्यांचे प्रचार दौर वेगात सुरू असून राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या जळगावमध्ये आहेत. तेथे माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. तसेच आगामी निवडणुकीत मविआ सरकारला राज्यात किती जागा मिळतील याचा अंदाजही त्यांनी वर्तवला आहे. गेल्या वेळचं चित्र आणि आताचे चित्र वेगळं आहे, त्यात जमीन आसमानचा फरक आहे असे शरद पवार यांनी नमूद केले. (राज्यात) काँग्रेस ला 10 ते 12 जागा मिळतील आणि आम्हाला आठ ते नऊ सुध्दां मिळू शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला.

काय म्हणाले शरद पवार ?

सध्या माझे लक्ष दहा जागांवर आहे, मात्र यावेळी बदल अनुकूल दिसतो आहे. काँग्रेसला 10 ते 12 जागा मिळतील आणि आम्हाला आठ ते नऊ सुध्दां मिळू शकतात. गेल्या वेळचं चित्र आणि आताचे चित्र वेगळं आहे, दोन्हीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे.

तर भाजपच्या 400 पार आकड्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आता त्यांनी 400 चा आकडा आणखी खाली आणला आहे. ज्यावेळेस प्रत्यक्ष निवडणूक होतील त्यावेळेस त्यांचा आकडा हा आणखी खाली आलेला दिसेल, असं शरद पवार म्हणाले.

मोदींच्या निर्णयावर केली टीका

सध्या परिस्थिती वेगाने बदलते आहे. लोकांमध्ये मोदींविषयी जी आस्था होती ती आता कमी होत आहे. मोदींनी अनेक गोष्टी सांगितल्या, मात्र प्रत्यक्ष कृती झालीच नाही. सरकारची परिस्थिती आहे की नाही हे न बघता ते थेट कुठल्याही निर्णयाबद्दल बोलतात, अशी टीका शरद पवार यांनी केली. मनमोहन सिंह यांनी जे निर्णय घेतले होते. त्यावर मोदींनी टीका केली, पण आता तेच निर्णय मोदी स्वतः घेत आहेत, हा विरोधाभास लोकांना दिसतो आहे. त्च्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या विषयी लोकांमध्ये नाराजी आहे. मनमोहन सिंग यांची दहा वर्ष आणि नरेंद्र मोदी यांची दहा वर्ष याची तुलना जर केली तर मनमोहन सिंग यांनी जे निर्णय घेतले ते कुठलाही गाजावाजा न करता घेतले. किंवा त्यांनी केलेल्या कृतीचा, निर्णयांचीही गवगवा केला नाही, असे म्हणत शरद पवार यांनी मोदींवर अप्रत्यक्षरित्या टीका केली.

उद्धव ठाकरेंवर ती वेळ कधीही येऊ नये

टीव्ही9 दिलेल्या महामुलाखतीत मोदींनी उद्धव ठाकरेंबद्दल भाष्य केले होते. त्यांच्या संकटकाळात मदत करणारा पहिला माणूस मी असेन, असे मोदी म्हणाले. त्यावर पवार यांनी प्रतिक्रिया दिली. मोदींनी लाख म्हटलं असेल, पण मोदींची मदत घेण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर कधीच येऊ नये असं शरद पवार म्हणाले.

Follow Us
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच...
चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार गटाला जबर धक्का, तो अधिकृत आदेश येताच मोठी खळबळ; महापालिकेत काय घडलं?
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड
सांभाळून बोला अन्यथा फोडायचं कसं...शिंदे गटातील महिला नेत्याचा प्रचंड संताप; नाव न घेता राऊतांना थेट इशारा?
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा
आता काही खऱं नाही! लोकशाहीचं... ठाकरे गटातील फुटीबाबत तज्ज्ञांचा मोठा इशारा, काय म्हणाले?
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ, खासदर फुट
ठाकरेंचे आणखी दोन खासदार....बड्या नेत्याच्या दाव्याने  खळबळ, खासदर फुटीनंतर आणखी मोठा धक्का!
अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ
मोठी बातमी! अजितदादांच्या पक्षाने व्हीप काढला पण...त्या उल्लेखानंतर मोठी खळबळ; सोलापुरात नेमकं काय घडतंय?
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं;
तर त्यांना गाडीसकट पेटवू...बंड करणाऱ्या खासदाराविरोधात वातावरण तापलं; थेट इशाराच दिला!
मुंबईत पोलीस तैनात! दिना पाटील यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त!
Operation Tiger | दिल्लीत बंड, मुंबईत पोलीस तैनात! संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर अचानक वाढवला पोलिस बंदोबस्त!
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या...
दिल्लीहून आल्यानंतर ओमराजे 3 तास विमानतळावरच बसून; नंतर दुसऱ्या... नेमकं कारण काय?
ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
Sushma Andhare | ठाकरेंना दुसरा मोठा धक्का! 6 खासदारांच्या बंडानंतर व्हीपही ठरला अवैध?
6 खासदार कुठे गेले?; सामंतांच्या एका वक्तव्याने राजकारणत खळबळ!
Uday Samant | 6 खासदार कुठे गेले?; उदय सामंतांच्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ!