AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 3 महत्वाचे मुद्दे उपस्थित, वाचा सविस्तर

भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर तीन महत्वाचे मुद्दे ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. तसंच या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना टोलेही लगावले आहेत.

Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून 3 महत्वाचे मुद्दे उपस्थित, वाचा सविस्तर
केशव उपाध्ये, भाजप प्रवक्ते
| Edited By: | Updated on: Jul 28, 2021 | 3:49 PM
Share

मुंबई : राज्यातील 6 जिल्हात महापुरानं घातलेलं थैमान, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि दरड कोसळून झालेले 100 पेक्षा अधिक मृत्यू, या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक आज पार पडणार आहे. या बैठकीत पूरग्रस्त नागरिक आणि शेतकऱ्यांसाठी मोठ्या मदतीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे संकेतही मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे. अशावेळी भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी तीन महत्वाचे मुद्दे ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत. तसंच या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना टोलेही लगावले आहेत. (Keshav Upadhyay presented 3 important points on the background of the state cabinet meeting)

‘आज ठाकरे मंत्रीमंडळाची बैठक आहे. आज तरी जनहिताचे निर्णय करणार का? मुख्यमंत्री #workFromHome करू शकतात पण मुंबईकरांना ॲाफिसला जावेच लागते. लोकल प्रवासबंदीमुळे जनतेत असंतोष आहे. उद्रेक होण्यापूर्वी राज्यसरकारने तातडीने निर्बंध शिथील करून लोकल प्रवास सर्वांसाठी सुरू करावा’, अशी मागणी उपाध्ये यांनी ट्विटरच्या माध्यमातून केलीय.

शाळा आणि पूरग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं

मागचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष शाळांअभावी वाया गेल्याने पालक व विद्यार्थी चिंताग्रस्त असून घरबसल्या शिक्षणाचा खर्चही विनाकारण वाढत आहे. अकरावी प्रवेशाचा घोळ अजूनही सुरूच असून कोविड संसर्ग कमी होत असल्याने प्रवेश प्रक्रियेबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी तब्बल ‘दोन तासाचा’ प्रत्यक्ष पाहणी करूनही अतिवृष्टी आणि दरडी कोसळण्यामुळे संकटग्रस्त असलेल्या जनतेस अद्यापही सरकारने कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. संकटग्रस्त जनतेसाठी कारण न शोधता तातडीने मदतीचे पॅकेज जाहीर करून पुनर्वसनाची प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवारांची माहिती

आठ दिवस झाले तरी पूरग्रस्तांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे सरकारी मदत कधी येईल याची पूरग्रस्तांना प्रतिक्षा आहे. मात्र, त्यांची ही प्रतिक्षा अवघ्या काही तासातच संपुष्टात येणार आहे. आज होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत देण्याचा शंभर टक्के निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. त्याआधीच विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. आज होत असलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत पूरग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय होणार आहे. शंभर टक्के निर्णय होणार आहे. तसेच एनडीआरएफच्या निकषांपेक्षाही अधिक मदत पूरग्रस्तांना दिली जाईल. या शिवाय छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांनाही दिलासा दिला जाईल, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

दोन डोस घेतलेल्यांना मुंबई लोकल प्रवासाची मुभा मिळण्याची शक्यता, अस्लम शेख यांचे संकेत

भाजपसोबत युती नाहीच, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार, संदीप देशपांडेची घोषणा

Keshav Upadhyay presented 3 important points on the background of the state cabinet meeting

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.