AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ZP निकालाने ना आनंदी, ना दु:खी, आता पुढच्या निवडणुकीत मोठं यश मिळवू : अजित पवार

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल काल स्पष्ट झाले. या निकालाने मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

ZP निकालाने ना आनंदी, ना दु:खी, आता पुढच्या निवडणुकीत मोठं यश मिळवू : अजित पवार
अजित पवार, उपमुख्यमंत्री
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 10:50 AM
Share

मुंबई :  जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांचे निकाल काल स्पष्ट झाले. या निकालाने मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.तसंच येणाऱ्या निवडणुकांमध्ये यापेक्षा मोठं यश मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

जिलहा परिषदेच्या 85 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 33 जागा जिंकल्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 17 जागा जिंकल्या. शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. पंचायत समितीच्या 144 जागांपैकी महाविकास आघाडीने 73 जागा जिंकल्या तर भाजपला 33 जागांवर यश मिळालं. अनेक जागांवर अनपेक्षित निकाल लागले. कुठे राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांचा पराभव झाला, तर कुठे सर्वसामान्य उमेदवारांनी दिग्गजांना धूळ चारली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवरात्रोत्सवाचं निमित्त साधून आज मुंबईत देवाचं दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर बाचचित केली. झेडपी निकालावर प्रतिक्रिया देताना या निकालाने मी ना आनंदी आहे ना दु:खी आहे, असं अजित पवार म्हणाले.

ZP निकालानंतर ना आनंदी ना दु:खी

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, “महाविकास आघाडी असली तरी आम्ही वेगवेगळं लढलो होतो, अशी आठवण यानिमित्ताने अजित पवार यांनी करुन दिली. आमच्या तिघांची मतं पाहिली तर ती निश्चित जास्त होतात”

“प्रत्येकाला वाटत होतं निवडणूक होऊच नये. कारण कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पूर्वीसारख्या जाहीर सभा घेता येत नव्हत्या. मतदारांपर्यंत पोहोचणं अवघड होतं. परंतु या सगळ्या वातावरणात जिल्हा परिषद निवडणूक पार पडली. जनतेनं समाधानकारक निकाल दिला आहे. पण असं असलं तरी मी आनंदी पण नाही आणि दु:खी पण नाही”, असं अजित पवार म्हणाले.

विजयी उमेदवारांचं अभिनंदन, पुढच्या निवडणुकीत यापेक्षा मोठं यश मिळवू

राज्यातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत विजय मिळवलेल्या राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं मनःपूर्वक अभिनंदन अजित पवार यांनी केलं. प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राच्या हितरक्षणासाठी, ग्रामीण जनतेच्या विकासासाठी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकजुटीनं कार्य करतील. जनतेचा विश्वास संपादन करुन पुढील निवडणुकांमध्ये याहून मोठं यश मिळवतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

(Maharashtra DCM Ajit Pawar reaction on Maharashtra ZP Election results Mahavikas Aaghadi BJP)

हे ही वाचा :

उद्धवजी, लोण्याचा गोळा कोण मटकावतंय, लक्षात आलंय का? ZP निकालावर चंद्रकांतदादांची ‘इशारा’ देणारी फेसबुक पोस्ट

मुख्यमंत्री मुंबादेवीच्या दर्शनाला, अजित पवार, जयंत पाटील सिद्धिविनायक चरणी लीन

Follow Us
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.