AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळमध्ये कट्टर शत्रूंच्या खांद्यावर पालखी, या जवळीकीचा अर्थ काय?

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेचं बिगुल वाजलं आहे. काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख लढत असलेल्या पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मतांवर डोळा ठेवून नेते कामाला लागले आहेत. सध्या जिल्ह्यात एका पालखीची जोरदार चर्चा आहे. पालखी जरी धार्मिक असली तरी किनार मात्र त्याला आपसूकच राजकीय लाभली आहे. एकमेकांचे वरवर […]

यवतमाळमध्ये कट्टर शत्रूंच्या खांद्यावर पालखी, या जवळीकीचा अर्थ काय?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेचं बिगुल वाजलं आहे. काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख लढत असलेल्या पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मतांवर डोळा ठेवून नेते कामाला लागले आहेत. सध्या जिल्ह्यात एका पालखीची जोरदार चर्चा आहे. पालखी जरी धार्मिक असली तरी किनार मात्र त्याला आपसूकच राजकीय लाभली आहे.

एकमेकांचे वरवर कट्टर राजकीय विरोधक दिसणारे दोन नेते या पालखीने एकत्र आणले. आता हे पालखीमुळे आले की राजकीय स्वार्थ आणि शह काटशह समोर ठेवून आले. हे लोकांना चांगलेच ठावूक आहे. हे दोन नेते म्हणजे काँग्रेस नेतेचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे आणि सेनेचे मंत्री संजय राठोड होत. हे दोनही नेते लोकांना जवळ करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. निमंत्रण असो वा नसो कार्यकर्ते त्यांना सिग्नल देतात की, भाऊ यावंच लागते. त्यामुळेच हे दोनही नेते लोकांच्या भेटी गाठी घेत राहतात.

एकेकाळी दिग्रस मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. हा बालेकिल्ला आता  सेनेचा गड झाला आहे. माणिकराव ठाकरे यांना चीत करुन संजय राठोड इथून आमदार आणि आता मंत्री झालेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर माणिकराव ठाकरे यांनी या मतदारसंघाकडे फारसे लक्ष दिले नाही. आता मात्र लोकसभा निवडणूक असल्याने आणि माणिकराव ठाकरे यांची जवळपास उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे. याचाच एक भाग म्हणून काल परवा मुंगसाजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हे दोनही नेते एकत्र आले. दोन्ही नेते मुगसाजी महाराजचे मोठे भक्त आहेत. नुसतेच एकत्र आले नाही, तर त्यांनी चक्क पालखी आपल्या खांद्यावर घेतली. त्यातही माणिकराव समोर आणि संजय राठोड मागे होते.

सध्या संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यामधून विस्तव जात नाही, हे सर्वश्रुत आहे. एकमेकांच्या बॅनरवर फोटो सुद्धा नसतात, इथवर गट पडले आहेत. त्यातच लोकसभा निवडणूक समोर आली आहे. भाऊ तुम्ही समोर व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे तर संजय राठोड यांना सुचवायचे नसेल? काही नवे राजकीय समीकरण तर यात नसेल? धार्मिक पालखी अचानक राजकीय स्वरुप धारण करु लागल्याने ही पालखी आता नव्या चर्चेला तोंड फोडणारी ठरली आहे.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा