AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यवतमाळमध्ये कट्टर शत्रूंच्या खांद्यावर पालखी, या जवळीकीचा अर्थ काय?

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेचं बिगुल वाजलं आहे. काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख लढत असलेल्या पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मतांवर डोळा ठेवून नेते कामाला लागले आहेत. सध्या जिल्ह्यात एका पालखीची जोरदार चर्चा आहे. पालखी जरी धार्मिक असली तरी किनार मात्र त्याला आपसूकच राजकीय लाभली आहे. एकमेकांचे वरवर […]

यवतमाळमध्ये कट्टर शत्रूंच्या खांद्यावर पालखी, या जवळीकीचा अर्थ काय?
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM
Share

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. लोकसभेचं बिगुल वाजलं आहे. काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख लढत असलेल्या पक्षांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे मतांवर डोळा ठेवून नेते कामाला लागले आहेत. सध्या जिल्ह्यात एका पालखीची जोरदार चर्चा आहे. पालखी जरी धार्मिक असली तरी किनार मात्र त्याला आपसूकच राजकीय लाभली आहे.

एकमेकांचे वरवर कट्टर राजकीय विरोधक दिसणारे दोन नेते या पालखीने एकत्र आणले. आता हे पालखीमुळे आले की राजकीय स्वार्थ आणि शह काटशह समोर ठेवून आले. हे लोकांना चांगलेच ठावूक आहे. हे दोन नेते म्हणजे काँग्रेस नेतेचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे आणि सेनेचे मंत्री संजय राठोड होत. हे दोनही नेते लोकांना जवळ करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. निमंत्रण असो वा नसो कार्यकर्ते त्यांना सिग्नल देतात की, भाऊ यावंच लागते. त्यामुळेच हे दोनही नेते लोकांच्या भेटी गाठी घेत राहतात.

एकेकाळी दिग्रस मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. हा बालेकिल्ला आता  सेनेचा गड झाला आहे. माणिकराव ठाकरे यांना चीत करुन संजय राठोड इथून आमदार आणि आता मंत्री झालेत. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर माणिकराव ठाकरे यांनी या मतदारसंघाकडे फारसे लक्ष दिले नाही. आता मात्र लोकसभा निवडणूक असल्याने आणि माणिकराव ठाकरे यांची जवळपास उमेदवारी निश्चित झाल्याने त्यांनी जनसंपर्क वाढविला आहे. याचाच एक भाग म्हणून काल परवा मुंगसाजी महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने हे दोनही नेते एकत्र आले. दोन्ही नेते मुगसाजी महाराजचे मोठे भक्त आहेत. नुसतेच एकत्र आले नाही, तर त्यांनी चक्क पालखी आपल्या खांद्यावर घेतली. त्यातही माणिकराव समोर आणि संजय राठोड मागे होते.

सध्या संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यामधून विस्तव जात नाही, हे सर्वश्रुत आहे. एकमेकांच्या बॅनरवर फोटो सुद्धा नसतात, इथवर गट पडले आहेत. त्यातच लोकसभा निवडणूक समोर आली आहे. भाऊ तुम्ही समोर व्हा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे तर संजय राठोड यांना सुचवायचे नसेल? काही नवे राजकीय समीकरण तर यात नसेल? धार्मिक पालखी अचानक राजकीय स्वरुप धारण करु लागल्याने ही पालखी आता नव्या चर्चेला तोंड फोडणारी ठरली आहे.

Follow Us
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागी मुंडेंना
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? बड्या मंत्र्याची जागा घेणार धनंजय मुंडे?
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
मोठी बातमी! शिंदे महत्त्वाचा संदेश घेऊन दिल्लीत? राजकीय घडामोडींना वेग
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील,
फक्त एक अट, तर देवेंद्र फडणवीसही उद्धव ठाकरेंसोबत रामरक्षा म्हणतील, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग
केद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराबाबत सर्वात मोठी अपडेट! ताकाद वाढली मग शिवसेनेचा कोणत्या पदावार दावा? शिंदेंनी दिलं थेट उत्तर
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60
पुण्यात खळबळ! पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी कनेक्शन, एकाच वेळी 60 हून अधिक...
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट!
सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावरून पाठवलेल्या नोटीसमध्ये मोठा ट्विस्ट! पत्रात मोठी विसंगती; 18 फेब्रुवारीशी काय कनेक्शन?
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली
केंद्रातील मंत्रीमंडळ विस्ताराच्या पर्श्वभूमीवर मोठ्या हालचाली! दिल्ली दौऱ्याआधीच एकनाथ शिंदेंनी...
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, काय घडणार?
राजकीय हालचालींना वेग! NCP तील मंत्र्यांची तातडीची बैठक, पुढे काय घडणार?
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधानांना पत्र
सिया केतन प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर! थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं पत्र
फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या
NCP | फक्त चर्चा की सत्य, राष्ट्रवादी पक्ष लवकरच फुटणार? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ