AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा; राजकारणात आम्हाला ओढले तर लोकसभेला जे झाले तेच…

मराठा समाजावर अन्याय केला तर तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मराठा समाजाला राजकारणात जायचे नाही. आमच्यापैकी कोणालाही राजकारण करायची इच्छा नाही. पण, आम्हाला राजकारणात ओढले तर तुमचा सत्यनाश झाल्याशिवाय राहणार नाही.

मनोज जरांगे पाटील यांचा इशारा; राजकारणात आम्हाला ओढले तर लोकसभेला जे झाले तेच...
manoj jarange patilImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jul 06, 2024 | 5:03 PM
Share

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनचा लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपला फटका बसला. मराठा समाजाने विरोधात केलेल्या मतदानामुळे महायुतीचे उमेदवार विजयापासून वंचित राहिले. लोकसभा निवडणुकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एका आंदोलनचे हत्यार उपसले. मात्र, सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन हे आंदोलन स्थगित करण्यात यश मिळविले. परंतु, जरांगे पाटील यांनी राज्यात पुन्हा एकदा सभा घेण्याचा धडाका सुरु केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील इंदिरा गांधी चौकात मनोज जरांगे पाटील यांची सभा झाली. या सभेत बोलताना जरांगे पाटील यांनी लोकसभेत जे झाले तेच पुन्हा विधानसभा निवडणुकीत होईल असा जाहीर इशारा दिला.

सरकारने आता शहाणपणाची भूमिका घेणे गरजेचे आहे. राज्यकर्त्यांनो मराठ्यांचा आक्रोश समजून घ्या. मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यामुळे सरसकट कुणबी आरक्षण द्या. आम्ही दिलेली सगेसोयरे याची जी व्याख्या केली त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.

साडेचार तास झाले समाज उन्हात रस्त्यावर आहे. समाजावर जेव्हा संकट येईल तेव्हा हिंगोली जिल्हा ताकतीने उभे राहिल. मराठाचा आक्रोश आज रस्त्यावर आला आहे. समाजाने एकजूट होऊन आरक्षण देण्याची ही वेळ आहे. एकमेकांची उणीधूनी काढायची वेळ नाही. सरकारने आरक्षण दिले नाही तर पुन्हा मुबंईला जावे लागेल, असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला साद घातली.

वकील गुणरत्न सदावर्ते यांचे नाव न घेता मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली. काहींचे म्हणणे आहे की सगेसोयरे टिकणार नाही. ते आपल्यातले काही आहेत. त्यांची दुकान आता बंद झाली आहेत त्यामुळे ते असे बोलत आहेत. मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले त्याविरोधात ते कोर्टात गेले. मराठा द्वेष याच्या मनात भरला आहे. पण, मराठ्यांसाठी मी पुन्हा लढायला तयार आहे. माझा जीव देखील द्यायला तयार आहे असे ते म्हणाले.

एकट्या भुजबळचे ऐकून समाजावर अन्याय केला तर याद राखा असा सरकारला इशारा देत ते पुढे म्हणाले, मराठा समाजावर अन्याय केला तर तुमचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मराठा समाजाला राजकारणात जायचे नाही. आमच्यापैकी कोणालाही राजकारण करायची इच्छा नाही. पण, आम्हाला राजकारणात ओढले तर तुमचा सत्यनाश झाल्याशिवाय राहणार नाही. काहीजण मला बोलतात की हा मिथुन आहे. अरे मी काहीही असेल तुला काय करायचे आहे, अशी टीकाही त्यांनी मंत्री भुजबळ यांचे नाव न घेता केली.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.