AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये, शिवसेना मंत्र्याचा दावा

महाराष्ट्रमध्ये जी सुरुवात महाविकास आघाडीने केली त्याचीच पुनरावृत्ती बिहार निवडणुकीत होणार असल्याचं भाकित शिवसेना नेते, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलंय.

महाराष्ट्रात जे घडलं त्याचीच पुनरावृत्ती बिहारमध्ये, शिवसेना मंत्र्याचा दावा
Akshay Adhav
Akshay Adhav | Edited By: Anish Bendre | Updated on: Nov 09, 2020 | 3:00 PM
Share

रत्नागिरी : महाराष्ट्रमध्ये जी सुरुवात महाविकास आघाडीने केली त्याचीच पुनरावृत्ती बिहार निवडणुकीत होणार असल्याचं भाकित शिवसेना नेते, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केलं आहे. येत्या 10 तारखेला बिहारच्या जनतेच्या मनात काय आहे हे नक्की सिद्ध होईल मात्र एनडीएचं सरकार बिहारमध्ये नक्कीच येणार नाही, असा दावा सामंत यांनी केला. (Minister Uday Samant on Bihar Eletion)

उदय सामंत यांनी पत्रकार घेत बिहार निवडणूक, मराठा आरक्षण, यूजीसी गाईडलाईन्स या मुद्द्यांवर भाष्य केलं. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला लोक नाकारतील आणि विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढलेल्या तेजस्वींना लोक पसंती देतील, असं उदय सामंत म्हणाले.

“मराठा आरक्षणासाठी महाविकास आघाडी सकारात्मक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळणार, असं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे विनायक मेटे काय म्हणतात यापेक्षा मुख्यमंत्री काय म्हणतात ते माझ्यासाठी महत्त्वाचा आहे”, असं उदय सामंत म्हणाले.

उदय सामंत यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. ओरस इथल्या शरद कृषी भवन इथे सामंत-जयंत पाटील यांची भेट झाली. राष्ट्रवादी आणि सेना नेत्यांच्या भेटीमुळे सिंधुदुर्गात राजकारणाची वेगळी नांदी मानली जातेय. दोन्हीही नेत्यांमध्ये दहा मिनिटं चर्चा झाली. जयंत पाटील माझे मार्गदर्शक आहेत. म्हणून मी त्यांना भेटलो, असं सामंत यांनी स्पष्ट केलं. भेटीमागचं वेगळं काहीही राजकीय गिमिक नाही. सिंधुदुर्गसाठी वेगळी स्ट‌ॅटर्जी करावी लागत नाही, सिंधुदुर्गवासियांनी स्ट‌ॅटर्जी ठरवली आहे. त्यामुळेच अनेक गोष्टी घडल्यात असं नाव न घेता उदय सामंत यांनी अप्रत्यक्ष राणे यांना टोला लगावला.

युजीसी गाईडलाईन अंतर्गत दिवाळीनंतर सर्व राज्यातील कुलगुरूंची बैठक घेणार आहे. महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असंही सामंत यांनी सांगितलं.

(Minister Uday Samant on Bihar Eletion)

संबंधित बातम्या

शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, उदय सामंत यांचा निशाणा

Uday Samant | कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही- उदय सामंत

Follow Us
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण