AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abdul Sattar : …तेव्हा चांगल वाटलं, मग आता निर्णयाला स्थगिती मिळाल्याचं वाईट का वाटतं? सत्तारांचा महाविकास आघाडीवर निशाणा

महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी आधीच्या भाजप (bjp) सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली होती. तेव्हा चांगले वाटले, मग आता निर्णयाला स्थगिती मिळत असताना वाईट का वाटत आहे? असा सवाल अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केलाय.

Abdul Sattar : ...तेव्हा चांगल वाटलं, मग आता निर्णयाला स्थगिती मिळाल्याचं वाईट का वाटतं? सत्तारांचा महाविकास आघाडीवर निशाणा
आ. अब्दुल सत्तार Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 15, 2022 | 12:51 PM
Share

औरंगाबाद : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. तसेच त्यापूर्वी देखील महाविकास आघाडीमधील मंत्र्यांनी विकास कामांच्या जीआरचा (GR) सपाटा लावला होता. माता आता नवे सरकार सत्तेत येताच यातील अनेक निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी देण्यात आली होती. मात्र या निर्णयाला देखील नव्या सरकारने स्थगिती दिल्याची माहिती समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा जे निर्णय घेण्यात आले ते सरकार अल्पमतात असताना घाईघाने घेण्यात आले होते. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्याचे काम नवे सरकार करत असल्याचे सत्तार यांनी म्हटले आहे.

नेमकं काय म्हटलं सत्तार यांनी?

महाविकास आघाडीच्या काळात शेवटी जे निर्णय घेण्यात आले ते घाईघाईने घेण्यात आले होते. सरकार अल्पमतात असताना हे निर्णय घेतले गेले होते. निर्णय घेताना इतकी घाई केली की लगेच कपडे  धुवायला जाणार आहेत. त्यामुळे या निर्णयाला स्थगिती देण्याचे काम सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार जेव्हा सत्तेत आले तेव्हा त्यांनी आधीच्या भाजप सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली होती. तेव्हा चांगले वाटले, मग आता निर्णयाला स्थगिती मिळत असताना वाईट का वाटत आहे? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केलाय. आता 165 आमदारांचा पाठिंबा असलेले मजबूत सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पूर्ण बहुमताने निर्णय घेतील असे सत्तार यांनी म्हटले आहे.

निधी वाटपाच्या निर्णयाला स्थगिती

पुढे बोलताना सत्तार यांनी म्हटले आहे की, निधी वाटपासंदर्भात मागच्या सरकारने जे निर्णय घेतले त्याला स्थगिती दिली जाणार आहे. त्या निर्णयामध्ये अनेक त्रुटी आहेत. काही जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी तर वर्षभराचा निधी एकाच दिवसांत वाटप केला. हे चुकीचे आहे, त्यामुळे या निर्णयाला स्थिगीती देऊन ज्या विकास कामाला प्राधान्य देणे गरजेचे आहे ती आधी केली जातील. त्यामुळे जे निर्णय स्थगित करण्यात येत आहेत, त्यावर कुणीही शंका घेण्याचे काम नसल्याचं यावेळी सत्तार यांनी म्हटले आहे.

Follow Us
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट....
नागरिकांनो घाबरू नका, राज्यात गॅसचा तुटवडा नाही, भुजबळ यांनी थेट.....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात....
युद्धाचा परिणाम मुंबईतील ड्रायफ्रूट मार्केटवर, सुकामेव्याच्या दरात.....
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत
आखाती युद्धाचा फटका शेतकऱ्यांना, हळदीचे दर घसरले, शेतकरी अडचणीत.
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल
काँग्रेसने खोट्या रील्सची इंडस्ट्री सुरू केली– मोदींचा हल्लाबोल.
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला
फडणवीसांचं गॅस तुटवड्यावर मोठं विधान, काँग्रेसवर केला घणाघाती हल्ला.
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार....
गॅस तुटवडा नियंत्रणासाठी सरकारची नवीन नियमावली; कोणाला मिळणार.....
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ
बदलापुरातील हॉटेल्समध्ये चुलीवर अन्न बनवण्याची वेळ.
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी सरकारवर घणाघाती हल्ला; केली खोचक टीका.
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला
सिलेंडर टंचाईवर संजय राऊतांचा सरकारवर घणाघाती हल्ला.
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती
बदलापूर स्त्री बीज प्रकरण संदर्भात रुपाली चाकणकरांनी दिली मोठी माहिती.