AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | ‘विजय झाला, मग आता उपोषणाला कशासाठी बसता?’ राज ठाकरेंचा मनोज जरांगे पाटलांना सवाल

Raj Thackeray | "एखादी गोष्ट पूर्ण होते, तेव्हा समाधानातून किती मतदान होतं हे माहित नाही. आजपर्यंत प्रश्नांवर निवडणूक झाली. उत्तरावर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे" मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्यावर हे मत व्यक्त केलं. "सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही. उद्या दुसरे तुमच्या अंगावर येतील, तेव्हा काय करणार?" असा सवाल राज ठाकरे भाजपाला विचारला.

Raj Thackeray | 'विजय झाला, मग आता उपोषणाला कशासाठी बसता?' राज ठाकरेंचा मनोज जरांगे पाटलांना सवाल
Raj Thackeray-Manoj jarange patil
| Updated on: Feb 02, 2024 | 1:11 PM
Share

नाशिक : “मराठी शाळा सेमी इंग्लिश करा. त्याशिवाय चालणार नाहीत. बालमोहन विद्यामंदिर शाळा सेमी इंग्लिश केली. आज 100 टक्के शाळा भरली” असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. मराठी शाळा बंद होतायत, त्या मुद्यावर राज ठाकरे यांनी पत्रकारांना हे उत्तर दिलं. ईडीच्या कारवाया महाराष्ट्रात होतात, त्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, “अशा प्रकारच राजकारण भाजपालाही परवडणार नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही. उद्या दुसरे तुमच्या अंगावर येतील, तेव्हा काय करणार? असा सवाल राज ठाकरे यांनी भाजपाला विचारला. “प्रत्येक निवडणूक वेगळी असते. शाश्वत ठोकताळे काही नसतात. आता यंदाच्या निवडणुकीत काय होईल, याचा अंदाज बांधण कठीण आहे. 1995 सालच्या निवडणुका या बाबरी मशिदीचा ढाचा तुटणं, बॉम्बस्फोट या मुद्यावर झालेल्या लोकांनी त्या रागातून मतदान केलं होतं. काँग्रेसच्या मतदारांनी शिवसेना-भाजपा युतीला मतदान केलं होतं” असं राज ठाकरे म्हणाले.

“2014 ला रागातून मतदान झालं होतं. एखादी गोष्ट पूर्ण होते, तेव्हा समाधानातून किती मतदान होतं हे माहित नाही. आजपर्यंत प्रश्नांवर निवडणूक झाली. उत्तरावर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. राम मंदिर झाल, याचा मला आनंद आहे. पण म्हणून मी काही भाजपाचा मतदार नाही” असं राज ठाकरे म्हणाले. बाळासाहेबांच्या खुर्चीबद्दल प्रश्न विचारताच राज ठाकरे म्हणाले, ‘त्यांचे प्रश्न त्यांना विचारा, मला मको’ सत्तेतले लोक विरोधी पक्षात आले की, गटबाजी दिसून येते, असं मनसेच्या अंतर्गत गटबाजीच्या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, “लोकांसमोर मी सांगितलेल हे होणार नाही. राज्य सरकार निर्णय घेऊ शकणार नाही. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले तेव्हा बोललेलो हे होणार नाही. हा टेक्निकल विषय आहे, कायदेशीरबाबी आहेत, असा निर्णय राज्य सरकर घेऊ शकणार नाही, त्यासाठी सुप्राीम कोर्टात जाव लागेल. अनेक प्रोसेस आहेत. मला वाटत मराठा समाजातल्या बांधवांनी याचा विचार केला पाहिजे”

‘त्यांना कळलं का, काय झालं?’

“मुख्यमंत्री त्या दिवशी तिथे गेलेले. विजयोत्सव साजरा झाला. कोणता विजय मिळाला? मराठा बांधव त्या मोर्चाला गेलेले, त्यांना कळलं का, काय झालं? विजय झाला, मग परत उपोषणाला कशाला बसता?” असा प्रश्न राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.