AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे मैदानात, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या भेटीची वेळ ठरली

या भेटीचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झाला नसला तरी लोकहिताच्या प्रश्नांवर दाद मागण्यासाठी राज ठाकरे हे राज्यपालांना भेटणार असल्याचे समजते. | Raj Thackeray

राज ठाकरे मैदानात, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या भेटीची वेळ ठरली
| Updated on: Oct 29, 2020 | 12:22 AM
Share

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीचा नेमका हेतू अद्याप स्पष्ट झाला नसला तरी लोकहिताच्या प्रश्नांवर दाद मागण्यासाठी राज ठाकरे हे राज्यपालांना भेटणार असल्याचे समजते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच पत्र लिहून राज्यपालांवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या राज्यपाल भेटीच्या टायमिंगची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (MNS chief Raj Thackeray will meet Governor Bhagat Singh Kohsyri )

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध संघटना, कर्मचारी आणि नागरिकांची शिष्टमंडळे सातत्याने कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेताना दिसत होती. यापैकी काही प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारमधील संबंधित मंत्र्यांशी फोनवरुन चर्चा करुन सोडवले होते. तर काही समस्यांसाठी राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, आता राज ठाकरे थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी राज्यातील मंदिरे उघडण्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. या पत्रात राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करुन दिली होती. तसेच तुम्ही आता ‘सेक्युलर’ झालात का, अशी टिप्पणीही केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना अत्यंत संयत पण परखड भाषेत प्रत्युत्तर दिले होते. या भाषाप्रयोगामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. यानंतर आजच शरद पवार यांनीही राजभवनाकडून प्रकाशित करण्यात आलेल्या कॉफी टेबल पुस्तकावरुन राज्यपालांना खरमरीत पत्र लिहले होते. या सगळ्यामुळे सध्या राजभवनाविषयी जनसामान्यांमध्ये काहीशी नकारात्मक प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

संबंधित बातम्या:

उद्धव ठाकरेंना लिहलेल्या ‘त्या’ पत्रात राज्यपालांनी काही शब्द टाळायला पाहिजे होते- अमित शाह

राज्यपालांना पॉलिटिकल एजंटसारखे वापरणे चांगल्या राज्यकर्त्याचे लक्षण नव्हे; राऊतांचा भाजपला टोला

स्वप्रसिद्ध पुस्तकात मुख्यमंत्र्यांचा सल्ला, गृहमंत्र्यांची दखल कुठे? शरद पवारांचं राज्यपालांना खरमरीत पत्र

(MNS chief Raj Thackeray will meet Governor Bhagat Singh Kohsyri )

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.