AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजबिलं भरूच नका; मनसेचं राज्यातील जनतेला आवाहन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यापाठोपाठ आता मनसेनेही राज्यातील जनतेला वीजबिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. (bala nandgaonkar has appealed to the people not to pay electricity bills)

वीजबिलं भरूच नका; मनसेचं राज्यातील जनतेला आवाहन
| Updated on: Nov 19, 2020 | 5:16 PM
Share

मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यापाठोपाठ आता मनसेनेही राज्यातील जनतेला वीजबिल न भरण्याचं आवाहन केलं आहे. वीजबिल भरू नका. काय होतं ते पाहू पुढे, असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. (bala nandgaonkar has appealed to the people not to pay electricity bills)

बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हे आवाहन केलं. सोमवारनंतर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचे मोर्चे निघतील. सरकारला वाढीव वीजबिल माफ करण्यास आम्ही भाग पाडू. तेव्हाही सरकारने ऐकलं नाही तर पुढे उग्र आंदोलनं करावी लागतील. आमची पुढची आंदोलनं कशी असतील त्याचं स्वरुप आता सांगता येणार नाही. सरकार आणि जनतेलाही आमची आंदोलनं कशी असतात हे माहीत आहे, असंही ते म्हणाले.

लॉकडाऊनच्या काळात एप्रिल ते जून दरम्यान जे वाढीव बिल देण्यात आलं त्याचा सरकारनं गांभीर्यानं विचार करायला हवा होता. दिवाळीपर्यंत आम्ही गोड बातमी देऊ असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. अजूनही ही बातमी आली नाही. एकीकडे सरकार निर्णय घेऊ म्हणून सांगत आहे आणि दुसरीकडे राज्याचे मंत्री वाढीव बिल माफ केलं जाणार नसल्याचं सांगतात. तुमच्यातच एकोपा नसेल तर लोकांनी त्याचा भुर्दंड का सोसायचा? असा सवाल करतानाच म्हणूनच आम्ही जनतेला वीजबिल न भरण्याचं आवाहन करत आहोत, असं नांदगावकर म्हणाले. जोपर्यंत राज्य सरकार निर्णय घेत नाही. तोपर्यंत बील भरूच नका. या सरकारला निर्णय घ्यायला आपण भाग पाडलंच पाहिजे, असंही ते म्हणाले.

पाच हजार कोटींचं कर्ज काढा, पण वीजबिल माफी द्या

1995 ला राज्यात युतीचं सरकार होतं. त्यावेळी राज्यावर 16 हजार कोटींचं कर्ज होतं. आता राज्यावर सुमारे साडेपाच लाख हजार कोटींचं कर्ज आहे, असं सांगतानाच वीजबिल माफीसाठी केवळ साडेचार हजार कोटी लागणार आहेत. त्यामुळे आणखी पाच हजार कोटींचं कर्ज घेतलं तर बिघडलं कुठे? घ्या कर्ज आणि द्या जनतेला दिलासा. कशाला भाजपवर बिल फाडता, असंही ते म्हणाले. राज्य सरकारने एसटी महामंडळाला एक हजार कोटी रुपये दिले. दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर सरकारने निर्णय घेतला. आता वीजबिल माफीसाठी जनतेने आत्महत्याच केली पाहिजे का?, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या:

शरद पवारांच्या शब्दालाही सरकारमध्ये किंमत उरली नाही : बाळा नांदगावकर

सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम, वीजबिल कमी करा अन्यथा उग्र आंदोलन, मनसेचा एल्गार

भाजपमध्ये मराठी माणसं नाहीत का?; प्रवीण दरेकरांचा राऊतांना सवाल

(bala nandgaonkar has appealed to the people not to pay electricity bills)

दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा
विलिनीकरणावरून पुन्हा खळबळ; शिंदे यांच्या लेखानंतर तटकरेंचा थेट इशारा.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून संजय राऊत यांचं खळबळजनक विधान.
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया
शशिकांत शिंदेंचा विलीनीकरणावर मोठा दावा; तटकरेंची तीव्र प्रतिक्रिया.
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?
विलिनीकरणाला 35 आमदारांचा पाठिंबा? काय म्हणाले सुनील तटकरे?.
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!
शिवभोजन थाळी चालकांची चंद्रशेखर बावनकुळेंसमोर जोरदार घोषणाबाजी!.