AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई पालिका निवडणुकीसाठी मनसेचा हिंदुत्वाचा नारा; परप्रांतियांचा मुद्दाही कायम; बाळा नांदगावकरांचं मोठं विधान

शिवसेना आणि भाजप यांच्यातील लढाईमुळे मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक प्रचंड चुरशीची ठरणार आहे. | bala nandgaonkar

मुंबई पालिका निवडणुकीसाठी मनसेचा हिंदुत्वाचा नारा; परप्रांतियांचा मुद्दाही कायम; बाळा नांदगावकरांचं मोठं विधान
| Updated on: Nov 24, 2020 | 9:00 PM
Share

सांगली: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक ही स्वबळावर लढवली जाईल, असे वक्तव्य बाळा नांदगावकर (bala nandgaonkar) यांनी केले आहे. या निवडणुकीत मनसे (MNS) ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत असेल. आगामी काळात हिंदुत्व हा मनसेचा प्रमुख अजेंडा असेल. मात्र, आम्ही परप्रांतीयांचा मुद्दा सोडणारही नाही, असे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले. (MNS will contest BMC election in Mumbai without any alliance says bala nandgaonkar)

शिवसेना आणि भाजप यांच्यातील लढाईमुळे मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक प्रचंड चुरशीची ठरणार आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी वेळ आल्यावर मुंबई महानगरपालिकेत मनसेशी युती करायची की नाही, याचा निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजप आणि मनसे युती करणार, अशा चर्चांनी जोर धरला होता.

मात्र, बाळा नांदगावकर यांनी भाजपसोबत युती करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. ते मंगळवारी सांगलीतील पदवीधर निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत असू, असे त्यांनी स्पष्ट केले. आता मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हातात घेतला असला तरी आम्ही कायम महाराष्ट्रातील भूमिपूत्रांसोबत राहू, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

‘सुडाचे राजकारण असले तरी प्रताप सरनाईकांनी ईडीच्या चौकशीला सामोरे जावे’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शरद पवार यांनाही ईडीची नोटीस आली होती. राज ठाकरे तेव्हा ‘ईडी’च्या चौकशीलाही सामोरे गेले. मग आता शिवसेनेच्या नेत्यांनीही चौकशीला सामोरे जावे. सुडाचे राजकारण जरी असले तरी प्रताप सरनाईकांनी चौकशीला सामोरे जावे, असा सल्ला बाळा नांदगावकर यांनी दिला.

महाविकासआघाडीने पुण्यात ‘आजोबांना’ पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिलेय; मनसेच्या रुपाली-पाटील ठोंबरेची टीका

महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदारासंघाचे उमेदवार हे आजोबा आहेत. कारण त्यांचे वय 75 वर्ष आहे. तर भाजपचे उमेदवार म्हणजे बुडीत कारखानदार आहेत. कारण त्यांनी अनेक शेतकऱ्यांचे पैसे बुडविले आहेत. ज्यांना पदवीधरांचे ज्ञान नाही, अशा नेत्यांनी या लोकांना उमेदवारी देणे म्हणजे पदवीधरांचा अपमान आहे”, असा घणाघात पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मनसेच्या उमेदवार रुपाली पाटील यांनी केला.

संबंधित बातम्या:

पत्रीपुलाचं श्रेय घेता आलं नाही, त्यामुळे पत्रीपूल-ठाकुर्ली रस्त्यासाठी आंदोलन, शिवसेनेची मनसे आमदारावर खरमरीत टीका

सरकार जाईल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, मनसेसोबत जाणार नाही : देवेंद्र फडणवीस

‘शिवसेनेचं लग्न एकाशी, लफडं दुसऱ्याबरोबर’, मनसे नेते संदीप देशपांडे यांचा शिवसेनेवर हल्लाबोल

(MNS will contest BMC election in Mumbai without any alliance says bala nandgaonkar)

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.