AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यभरात 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध 

राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर 798 उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने ते नामंजूर झाले (Valid candidate  for assembly election) आहेत.

राज्यभरात 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध 
| Updated on: Oct 06, 2019 | 8:26 AM
Share

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांनी दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची काल (5 ऑक्टोबर) राज्यभरात छाननी (Valid candidate  for assembly election) करण्यात आली. त्यामध्ये राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल 5 हजार 543 उमेदवारांपैकी 4 हजार 739 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले (Valid candidate  for assembly election) आहेत. तर 798 उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्याने ते नामंजूर झाले (Valid candidate  for assembly election) आहेत. अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली.

आज छाननीअंती नंदुरबार जिल्ह्यात 4 मतदारसंघात 36 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. तर धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 56 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 154 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 75 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 101 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 60 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

त्याशिवाय अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 151 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 59 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 181 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 66 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 71 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 44 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 90 उमेदवार, यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 125 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

तसेच नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 327 उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 54 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 81 उमेदवार, जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 133 उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 208 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 212 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 69 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 251 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.

मुंबई उपनगर जिल्ह्यात 25 मतदारसंघात 272 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 84 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान यात वांद्रे पश्चिम मतदारसंघाची माहिती दर्शवलेली (Valid candidate  for assembly election) नाही.

तर रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 112 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 372 उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 182 उमेदवार, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 202 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 120 उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 मतदारसंघात 82 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात 237 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 108 उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 40 उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात 27 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 186 उमेदवार, सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघात 111 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.