AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : औरंगजेब फॅन्स क्लब भाजपा, गुजरातमध्ये, संजय राऊतांचे जिव्हारी लागणारे शब्द

Sanjay Raut : "देवेंद्र फडणवीस हे राजकारणात पावसाळयात उगवलेल्या छत्रीसारखे आहेत. . आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो, त्यांना खलनायक मानतो. याला ते स्वत: जबाबदार आहेत. महाराष्ट्रात सत्तेवर यावं लागेल. फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी केलेली घाण साफ करावी लागेल" असं संजय राऊत म्हणाले.

Sanjay Raut : औरंगजेब फॅन्स क्लब भाजपा, गुजरातमध्ये, संजय राऊतांचे जिव्हारी लागणारे शब्द
| Updated on: Jul 27, 2024 | 11:02 AM
Share

“बॅनर लावणं ही लोकभावना आहे. पोस्टर, बॅनर लावा म्हणून आम्ही सांगत नाही. लोक आपल्या भावना अशा पद्धतीने व्यक्त करतात. त्या विषयी दु:ख वाटण्याचं कारण नाही. काही पक्षात तीन-तीन नेत्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागतात. महायुतीत सात लोक मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांनी या राज्याच मुख्यमंत्री म्हणून संकटकाळात नेतृत्व केलं. राज्य, देश संकटात असताना त्यांनी ज्या पद्धतीने नेतृत्व केलं, ते लोक विसरलेले नाहीत” असं खासदार संजय राऊत म्हणाले. “उद्धव ठाकरे एक आश्वासक चेहरा आहे. संघर्षातून ते वारंवार उभे राहतात. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेतात” असं गुणगान संजय राऊत यांनी केलं.

“नरेंद्र मोदी आणि अमित शाह या गुजरातच्या दोन व्यापाऱ्यांनी सत्ता, दहशतीच्या बळावर हिंदूह्दय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ओरबडून घेतली. चिन्ह, पक्ष ओरबडून घेतलं. गद्दाराच्या हातात दिली. त्यांना वाटलं नेतृत्व संपलं म्हणजे शिवसेना संपली. त्या संकटकाळात सुद्धा उद्धव ठाकरे जिद्दीने उभे राहिले. 9 खासदार वेगळ्या चिन्हावर निवडून आणले. आज विधानसभा जिंकण्याच्या दिशेने आम्ही दमदार पावलं टाकत आहोत हे सोपं नाही” असं संजय राऊत म्हणाले.

औरगंजेब फॅन्स क्लब भाजपात

“या राज्याची जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभी राहिली. गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले, चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेना, ठाकरेंना खतम करत येणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे छत्रपती शिवाजी फॅन क्लब चालतो. औरंगजेब फॅन्स क्लब भाजपा, गुजरातमध्ये आहे. कारण औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला” असं संजय राऊत म्हणाले.

‘फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी केलेली घाण साफ करावी लागेल’

“देवेंद्र फडणवीस हे राजकारणात पावसाळयात उगवलेल्या छत्रीसारखे आहेत. अलीकडे राजस्थान, मध्य प्रदेशात मुख्यमंत्री नेमले गेले ते कोणालाही माहित नव्हते, तसच अनेक अनुभवी नेत्यांना डावलून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवलं गेलं. आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो, त्यांना खलनायक मानतो. याला ते स्वत: जबाबदार आहेत. त्यांनी नेतृत्वाची संधी गमावली. भाजपाच्या कपटनितीने महाराष्ट्राच नुकसान केलं. ते भरुन येणं सोपं नाही. त्यासाठी महाराष्ट्रात सत्तेवर यावं लागेल. फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी केलेली घाण साफ करावी लागेल” असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव
सोलापुरात महापुरुषांच्या पुतळ्यावरून वाद; पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणाव.
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी
राज्यभरात हनुमान जयंतीचा उत्साह, अंजनेरी मंदिरात भाविकांची गर्दी.
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका
हा आयोग चोर आहे... राऊतांची निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका.
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?
अजितदादाच्या राष्ट्रवादीत मोठा भूकंप होणार? किती आमदार फुटणार?.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुनील तटकरे यांचा यू-टर्न.
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध
अजब-गजब ऐतिहासिक दावे जैन मुनीच्याच अंगलट; जैन समाजातूनच तीव्र विरोध.
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.