AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार केलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा घणाघात

Maharashtra Political Crisis : पहाटे-दुपारी लोक झोपत असताना शपथ अजितदादा शपथ घेतात; ठाकरे गटाच्या नेत्याचा अजित पवारांना टोला तर भाजपवर टीकास्त्र

भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणाचं गटार केलंय; ठाकरे गटाच्या नेत्याचा घणाघात
Image Credit source: PTI
| Updated on: Jul 03, 2023 | 4:19 PM
Share

मुंबई : अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यावरून शिवसेवेच्या ठाकरे गटाने भाजपवर टीकास्त्र डागलंय. भाजपने राज्यातील राजकारणाचं गटार केलं आहे. अतिशय खालच्या स्तरावर जाऊन हे राजकारण सुरु आहे. अजितदादांची मनाची तयारी होती. म्हणून त्यांना कोणी रोखलं नाही,असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राज्यपाल रमेश बैस यांची भूमिका भगतसिंह कोश्यारी यांच्या पुढची आहे की काय अशा प्रकारची स्थिती आहे. राष्ट्रवादी जे आमदार फुटले त्यांनी कळवले की नाही हे माहीत नाही. पण या शपथविधीमुळे महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल, असं दानवे म्हणालेत.

गेली अनेक वर्षे शिवसैनिक गुरुपौर्णिमेनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी येतो. आज आम्ही अभिवादन केलं, असं दानवे म्हणालेत.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर कोण कसं वेगळे झालं हे महाराष्ट्र्राला माहीत आहे. ज्या गोष्ठी शक्य नाही त्यावर बोलणं योग्य नाही. महाविकास आघाडीची दहशत आहे. म्हणूनच ही महाविकास आघाडी फोडण्याचं काम केलं जात आहे. सध्या आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत आणि आमची आघाडी मजबूत आहे, असं अंबादास दानवे म्हणालेत.

अजित पवार सकाळी दुपारी लोक झोपलेले असताना शपथ घेतात. भाजपने देशातील, महाराष्ट्रातील राजकारण नासवलं आहे. पार्टी विथ डिफ्रान्स म्हणणारी पार्टी सत्तेसाठी काहीही करायला लागली आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी टीकास्त्र डागलं आहे.

काहीही फरक पडणार नाही. देशाच्या पंतप्रधानांनी नाव घेऊन राष्ट्रवादीवर टीका केली. आज त्याच लोकांना सोबत घेतलं आहे.अजित पवार यांना भाजपने सोबत घेतलं आहे. आम्ही आमची कातडी वाचवण्यासाठी जातो. नेतृत्वाच्या पाठीत खंजीर खुपसतो, अशी या लोकांची भूमिका आहे, असं म्हणत अरविंद सावंत यांनीही टीका केली आहे.

अजित पवार यांना गद्दार म्हणायचं की नाही तो त्या पक्षाचा प्रश्न आहे. आमचा मराठी भाषेतला शब्द गद्दारी आहे.तो आम्ही शिंदे गटासाठी वापरतो कारण त्यांनी गद्दारीच केली आहे, असं सावंत म्हणालेत.

Follow Us
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती....
जागतिक उलथापालथीच्या काळात मोदींच्या नेतृत्वात भारताची प्रगती.....
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी
राऊत यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल पंतप्रधान मोदींबाबत मोठी भविष्यवाणी.
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा
शिवनिका ट्रस्ट प्रकरणी SIT स्थापन; ट्रस्टींवरही येणार तपासाचा फेरा.
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं
इराण-अमेरिका युद्धाचा भारतावर काय परिणाम?मोदींनी लोकसभेत सगळं सांगितलं.
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....