AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कृषी-सहकार क्षेत्र अन् निवडणुका; अमित शाह यांना भेटताच एकनाथ शिंदे यांनी ‘तो’ निर्धार बोलून दाखवला

CM Eknath Shinde Tweet : अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांचं ट्विट; म्हणाले 'या' विषयांवर चर्चा केली

कृषी-सहकार क्षेत्र अन् निवडणुका; अमित शाह यांना भेटताच एकनाथ शिंदे यांनी 'तो' निर्धार बोलून दाखवला
| Updated on: Jun 05, 2023 | 11:13 AM
Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कृषी, सहकार विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं. ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली. तसंच आगामी निवडणुकांबाबतही त्यांनी निर्धार बोलून दाखवला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट

काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली, असं ट्विट शिंदेंनी केलं आहे.

राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली, असं ते म्हणालेत.

राज्यात आगामी सर्व निवडणुका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, राखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार…, असं एकनाथ शिंदे ट्विटमध्ये म्हणालेत.

मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा?

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी झालेल्या अमित शाह यांच्या भेटीत आगामी कॅबिनेट विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. महिलांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात येणार आहे. महिलांचा सन्मान ही प्राथमिकता असल्याचं कळतं आहे. युवा नेत्यांना या कॅबिनेटमध्ये संधी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. शिवीगाळ करणार, आक्षेपार्ह वक्तव्य, वर्तन करणारे नेते दूर ठेवा. घरी किंवा बंगल्यावर बसून नाही तर फिल्डवर ऊतरून काम करणारे नेते कॅबिनेटमध्ये घ्या, अशी मुख्यमंत्र्यांची भावना असल्याचं कळतं आहे.

महायुतीवर लागलेला 50 खोके एकदम ओके या डागाला कामाच्या माध्यमातून उत्तर देण्यावर जोर असल्याचं कळतंय. राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक जास्त परिश्रम करावेत, अशीही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे.

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये वर्षा बंगल्यावर काही दिवसांआधी भेट झाली. या भेटीवरही चर्चा झाली असल्याची माहिती आहे. तसंच महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांवर केंद्र सरकारचं मार्गदर्शन आणि सहाकार्यावर चर्चा झाली.

Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.