AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ उमेदवाराला आपणच निवडून येऊ असं का वाटतंय?; अंधेरी पूर्व मतदारसंघात काय घडणार?

अपक्ष उमेदवार राजेश त्रिपाठी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोक मोठ्या संख्येने घराबाहेर येत आहेत आणि मतदान करत आहेत. 6 नोव्हेंबर रोजी मी प्रचंड बहुमताने विजयी होत आहे.

'या' उमेदवाराला आपणच निवडून येऊ असं का वाटतंय?; अंधेरी पूर्व मतदारसंघात काय घडणार?
'या' उमेदवाराला आपणच निवडून येऊ असं का वाटतंय?; अंधेरी पूर्व मतदारसंघात काय घडणार?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 03, 2022 | 11:31 AM
Share

मुंबई: अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (andheri bypoll) मतदान सुरू झालं आहे. या निवडणुकीचा 6 तारखेला निकाल लागणार आहे. भाजपने या निवडणुकीतून माघार घेतल्याने ही निवडणूक एकतर्फी होणार असून ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा विजय होणार असल्याचं मानलं जात आहे. मात्र, आज मतदानाच्याच दिवशी दोन महत्त्वाच्या प्रतिक्रिया आल्याने त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. ऋतुजा लटके यांची तृप्ती सावंत करू नका, असं टोला भाजपचे नेते मुरजी पटेल (murji patel) यांनी ठाकरे गटाला लगावला आहे. तर निवडणुकीतील अपक्ष उमेदवाराने आपणच विजयी होऊ असा दावा केला आहे. त्यामुळे हा अपक्ष आमदार कशाच्या भरोश्यावर हा दावा करतोय, अशी जोरदार चर्चा रंगली आहे.

भाजप नेते मुरजी पटेल यांनी आज अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी मतदान केलं. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधताना ठाकरे गटाला कानपिचक्या देतानाच ऋतुजा लटके यांची तृप्ती सावंत होऊ नये अशी भितीही व्यक्त केली.

आता एकच अपेक्षा आहे ऋतुजा लटकेंची शिवसेनेनं तृप्ती सावंत करु नये. आज त्या निवडणूक लढवत आहेत. जिंकूनही येतील. नंतर ऋतुजा लटकेंना एकटं पाडलं जाऊ नये. जे वांद्र्यात झालं. ते अंधेरीत घडू नये, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. तसेच नोटाचा प्रचार कोणीही करत नाहीये. हा आरोप चुकीचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

अंधेरीच्या लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावे. आपला मतदानाचा हक्क बजवावा, असं आवाहन त्यांनी केलं. नोटाचा कुणीही प्रचार करत नाहीये. असं काही घडलं नाही. अन् आम्ही असं काही करणार नाही. आम्ही लोकभावना लक्षात घेता आमची उमेदवारी मागे घेतली. त्यांनी त्याचा सन्मान केला पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

दरम्यान, अंधेरी मतदारसंघातील सर्व 256 मतदान केंद्रांवर मतदानाला सकाळी 7 वाजतापासून प्रत्यक्ष मतदानास सुरुवात झाली आहे. यात सकाळी 11 वाजेपर्यंत 9.72 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

दरम्यान, अपक्ष उमेदवार राजेश त्रिपाठी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोक मोठ्या संख्येने घराबाहेर येत आहेत आणि मतदान करत आहेत. 6 नोव्हेंबर रोजी मी प्रचंड बहुमताने विजयी होत आहे, असा दावा राजेश त्रिपाठी यांनी केला आहे.

जनतेला सर्व काही माहीत आहे. नोटाच्या प्रचारामुळे काहीही फरक पडणार नाही, असंही त्रिपाठी म्हणाले. अंधेरी पूर्व भागात वाहतुकीची मोठी समस्या आहे. चांगली शाळा, रुग्णालय नाही. त्यामुळे या गोष्टी या भागात झाल्या पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.

तसेच कोल्हापूर आणि पंढरपूरमध्ये मतदान झालेय तिथे महाराष्ट्राची संस्कृती दिसत नव्हती, असा चिमटाही त्यांनी काढला.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.