AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालना मी शिवसेनामय केलाय, आता माघार नाही : अर्जुन खोतकर

मुंबई : लोकसभा निवडणूक लढण्याबाबत शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतरही त्यांनी निवडणूक लढण्याची भूमिका कायम ठेवली. गेल्या दोन वर्षात जालना लोकसभा मतदारसंघ शिवसेनामय केलाय, त्यामुळे आता माघार शक्य नाही, असं अर्जुन खोतकर म्हणाले. शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत जालना मतदारसंघ भाजपकडे आहेत. […]

जालना मी शिवसेनामय केलाय, आता माघार नाही : अर्जुन खोतकर
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणूक लढण्याबाबत शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतरही त्यांनी निवडणूक लढण्याची भूमिका कायम ठेवली. गेल्या दोन वर्षात जालना लोकसभा मतदारसंघ शिवसेनामय केलाय, त्यामुळे आता माघार शक्य नाही, असं अर्जुन खोतकर म्हणाले.

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत जालना मतदारसंघ भाजपकडे आहेत. जालन्याचे विद्यमान खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवार असतील. पण दानवेंविरोधात लढण्याची भूमिका खोतकरांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. युती झाल्यानंतर खोतकरांची अडचण झाली. पण त्यांनी ही जागा न मिळाल्यास बंडखोरीचे संकेतही दिले आहेत.

उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झाल्याचं खोतकरांनी सांगितलं. भेटीबाबत ते म्हणाले, “काही तक्रारी केल्या, माझ्यावरती काय अन्याय झाला, प्रसंग झाला याबाबत उद्धव ठाकरे यांना सांगितलं. मी पुढे गेलोय. मतदारसंघ हा शिवसेनेकडे आला पाहिजे ही मागणी केली आहे. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’वर भेटतील. पक्षावर कोणतीही नाराजी नाही. मी बाजारात चांगला माल आहे. उद्धव ठाकरे उद्या सांगतील ते मी मान्य करेन. मुख्यमंत्र्यांबाबत आदर आहे, त्यांनी कायम साथ दिली. माझी भूमिका उद्धव ठाकरेच ठरवतील, असं खोतकर म्हणाले.

खोतकरांच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसही पुढे सरसावली होती. पण आपण ठाकरे घरण्याला कधीही धोका देणार नसल्याचं खोतकरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल हे मान्य केलं असलं तरी दानवेंविरोधात लढण्याची त्यांची भूमिका कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर काय निर्णय होतो त्याकडे लक्ष लागलंय.

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.