AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालना मी शिवसेनामय केलाय, आता माघार नाही : अर्जुन खोतकर

मुंबई : लोकसभा निवडणूक लढण्याबाबत शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतरही त्यांनी निवडणूक लढण्याची भूमिका कायम ठेवली. गेल्या दोन वर्षात जालना लोकसभा मतदारसंघ शिवसेनामय केलाय, त्यामुळे आता माघार शक्य नाही, असं अर्जुन खोतकर म्हणाले. शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत जालना मतदारसंघ भाजपकडे आहेत. […]

जालना मी शिवसेनामय केलाय, आता माघार नाही : अर्जुन खोतकर
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM
Share

मुंबई : लोकसभा निवडणूक लढण्याबाबत शिवसेना मंत्री अर्जुन खोतकर त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. त्यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भेटीनंतरही त्यांनी निवडणूक लढण्याची भूमिका कायम ठेवली. गेल्या दोन वर्षात जालना लोकसभा मतदारसंघ शिवसेनामय केलाय, त्यामुळे आता माघार शक्य नाही, असं अर्जुन खोतकर म्हणाले.

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीत जालना मतदारसंघ भाजपकडे आहेत. जालन्याचे विद्यमान खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे पुन्हा एकदा या मतदारसंघातून उमेदवार असतील. पण दानवेंविरोधात लढण्याची भूमिका खोतकरांनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. युती झाल्यानंतर खोतकरांची अडचण झाली. पण त्यांनी ही जागा न मिळाल्यास बंडखोरीचे संकेतही दिले आहेत.

उद्धव ठाकरेंसोबत सविस्तर चर्चा झाल्याचं खोतकरांनी सांगितलं. भेटीबाबत ते म्हणाले, “काही तक्रारी केल्या, माझ्यावरती काय अन्याय झाला, प्रसंग झाला याबाबत उद्धव ठाकरे यांना सांगितलं. मी पुढे गेलोय. मतदारसंघ हा शिवसेनेकडे आला पाहिजे ही मागणी केली आहे. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’वर भेटतील. पक्षावर कोणतीही नाराजी नाही. मी बाजारात चांगला माल आहे. उद्धव ठाकरे उद्या सांगतील ते मी मान्य करेन. मुख्यमंत्र्यांबाबत आदर आहे, त्यांनी कायम साथ दिली. माझी भूमिका उद्धव ठाकरेच ठरवतील, असं खोतकर म्हणाले.

खोतकरांच्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसही पुढे सरसावली होती. पण आपण ठाकरे घरण्याला कधीही धोका देणार नसल्याचं खोतकरांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेईल हे मान्य केलं असलं तरी दानवेंविरोधात लढण्याची त्यांची भूमिका कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर काय निर्णय होतो त्याकडे लक्ष लागलंय.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक