AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अर्ध्या रात्री काँग्रेस नेत्याला उठवावं, 1 नंबरचा शत्रू कोण विचारावं… आशिष देशमुख म्हणाले.. भाजप हे उत्तर मिळणार नाही.. काँग्रेसला घरचा आहेर….

आज काँग्रेसच्या पडत्या काळात, कोणत्याही काँग्रेस नेत्याला अर्ध्या रात्रीतून विचारलं, तुमचा 1 नंबरचा शत्रू कोण आहे... तर तो अपेक्षित उत्तर देणार, असा दावा आशिष देशमुख यांनी केलाय.

अर्ध्या रात्री काँग्रेस नेत्याला उठवावं, 1 नंबरचा शत्रू कोण विचारावं... आशिष देशमुख म्हणाले.. भाजप हे उत्तर मिळणार नाही.. काँग्रेसला घरचा आहेर....
Image Credit source: social media
| Updated on: Jan 11, 2023 | 2:23 PM
Share

गजानन उमाटे, नागपूरः अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (Congress committee) कार्यकर्त्यांसाठी हाथ से हात जोडो.. हे महाअभियान सुरु केलंय. पण काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) नेत्यांनीच सर्वप्रथम हातात हात मिळावावेत, अशा स्थितीत जनतेच्या समोर जावं.. नम्रतेने वागणूक ठेवावी… तरच देशातील परिस्थिती बदलेल, असा सल्ला काँग्रेसच्याच नेत्याने दिला आहे. नागपूर काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी टीव्ही 9 प्रतिनिधींशी बोलताना काँग्रेसला हा घरचा आहेर दिला आहे.

काँग्रेस नेते ज्या आविर्भावात वावरत असतात, तो सोडून द्यावा. त्यांनी नम्रपणे जनतेसमोर जावे, घरोघरी जावे, लोकांशी संपर्क साधला पाहिजे, ही काँग्रेस जनांची भावना आहे, असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलं.

आज काँग्रेसच्या पडत्या काळात, कोणत्याही काँग्रेस नेत्याला अर्ध्या रात्रीतून विचारलं, तुमचा 1 नंबरचा शत्रू कोण आहे तर.. तो भाजप किंवा इतर विरोधी पक्ष आठवत नाहीत. तर काँग्रेसचाच दुसरा नेता आठवतो. ही स्थिती बदलल्याशिवाय काँग्रेसला यश येणं कठीण आहे, असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलंय.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे देशात सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. याचं मतात रुपांतर करणं गरजेचं आहे. महापालिका, जिल्हा परिषदा असो किंवा विधानसभा लोकसभेत इलेक्टोरल रिझल्टसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे.

काँग्रेस नेत्यांनी आपापसात हातमिळवणी करणं गरजेचं आहे, असं मत आशिष देशमुख यांनी व्यक्त केलंय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना सदर विनंती करणार का, असा सवाल विचारला असता आशिष देशमुख यांनी यावरही मोठं वक्तव्य केलंय.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे खूप मोठे नेते आहेत. आमच्यासारख्या लहान नेत्यांनी त्यांना सांगू नये, मात्र या वक्तव्यांतून त्यांनीही निश्चित बोध घ्यावा, असं वक्तव्य आशिष देशमुख यांनी केलंय.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.