मुंबई : नायर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका बाळाचा मृत्यू झाल्यानं भाजप आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) जोरदार हल्ला चढवला आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे एका बाळाचा मृत्यू झाला. त्यावरून प्रशासनाला जाब विचारायला जाणाऱ्या भाजपच्या नगरसेविकांशी असभ्य भाषेत बोललं जातं. त्यांना मारण्यासाठी गुंडांना बोलावलं जातं. ही अरेरावी कशासाठी? राज्यात काय गब्बरचं राज्य आहे का? असा सवाल शेलार यांनी केलाय. शेलारांच्या या टीकेला महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. आशिष शेलार पत्रकार परिषद घेऊन दिशाभूल करत असल्याचा आरोप पेडणेकर यांनी केलाय.