AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार : नाना पटोले

राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार आहे. या सरकारनं प्रथम शेतकर्‍यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय, असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं (Nana Patole on Maha Vikas Aghadi Government).

राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार : नाना पटोले
| Updated on: Jan 12, 2020 | 11:44 PM
Share

अहमदनगर : राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार आहे. या सरकारनं प्रथम शेतकर्‍यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय, असं मत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केलं (Nana Patole on Maha Vikas Aghadi Government). संगमनेर येथे अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्यावतीने सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य असणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आलं. यावेळी नाना पटोले बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “राज्यात ब्रम्हा, विष्णु आणि महेश असं विकासाचं सरकार आहे. या सरकारनं प्रथम शेतकर्‍यांची कर्जमाफी करुन एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. मी विधानसभा अध्यक्ष या नात्याने जनतेचा प्रतिनिधी म्हणून काम करेल. जनतेची कामे सरकारकडून करुन घेण्यासाठी मी सरकारलाही धारेवर धरेल.”

मागील 5 वर्षांमध्ये आरक्षणासाठी विविध समाजाच्यावतीने आंदोलनं करण्यात आली होती. त्यामुळे 2021 मध्ये जातीनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक ठराव विधानसभेनं केलाय. जातनिहाय जनगणनेमुळे जाती-जातीतील भांडणं संपुष्टात येतील, असंही नाना पटोले यांनी नमूद केलं.

“संघाने महाराष्ट्राच्या तुकड्यांच्या प्रस्तावाऐवजी सर्वांगीन विकासाचे प्रस्ताव द्यावेत”

नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या विभाजनाच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीका केली. ते म्हणाले, “संघाच्या मा. गो वैद्य यांनी महाराष्ट्राचे 4 राज्यांमध्ये विभाजन करण्याचं वक्तव्यं केलं. मात्र, त्यांनी महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे प्रस्ताव देण्यापेक्षा सर्वांगीन विकासाचे प्रस्ताव द्यायला हवेत. संयुक्त महाराष्ट्र देशात शक्तिशाली बनवण्यासाठी विकासाचे प्रस्ताव द्यावेत.”

महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता आहे. मधल्या काळात नगर जिल्ह्यातील लोकांनी थोरातांना खुप त्रास दिला. मात्र, ते डगमगले नाहीत, असं सांगत नाना पटोलेंनी विखेंना नाव न घेता टोला लगावला. या कार्यक्रमासाठी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.