AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supriya Sule : अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालेन- सुप्रिया सुळे

Supriya Sule on Ajit Pawar : नांदेड रुग्णमृत्यूंच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आज नांदेडमध्ये आहेत. तिथे त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्रिपद आणि अजित पवार यांच्यावर भाष्य केलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.

Supriya Sule : अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालेन- सुप्रिया सुळे
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 05, 2023 | 3:33 PM
Share

नांदेड | 05 ऑक्टोबर 2023, नजीर खान : अजित पवार हे भाजपसोबत गेले तेव्हापासूनच अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा होती. खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील. पण सध्या शिंदेच मुख्यमंत्री आहेत, असं म्हटलं. याबाबत प्रश्न विचारला असता राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर भाष्य केलं. अजितदादा मुख्यमंत्री झाले तर पहिला हार मी घालेन, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या आज नांदेडमध्ये आहेत. तिथे त्यांनी माध्यांमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

अजितदादा मुख्यमंत्री झाले तर सर्वात आधी पहिला हार मी घालेन. पण सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता हाडाच्या भाजपच्या नेत्यांचे हाल होत आहेत. मात्र मला आनंद आहे की, सध्या युतीच्या पहिल्या पंक्तीत आमचेच सहकारी नेते बसलेले आहेत. नांदेडमध्ये एका दिवसात 24 रूग्णांचा मृत्यू झाला. यावरून सध्या संताप व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे आज नांदेडमध्ये आहेत. इथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी नांदेडमधील घटनेसोबतच त्यांनी राजकीय मुद्द्यांवरही भाष्य केलं.

देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास नसेल. मात्र भाऊ म्हणून मला त्यांच्यावर विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस यांनी रोज शरद पवारांना नावं ठेवावीत. मात्र नांदेडमध्ये लोकांना योग्य उपचार द्यावा. नांदेडची घटना वेदना देणारी आहे. मृतांचा आकडा 24, 38 , 41 हे नंबर फार दुःखद आहेत. ट्रीपल इंजिन सरकार दिल्लीला जातं. यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात. मात्र नांदेडला येत नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचा मी निषेध करते, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मला इथं आता एक माता भेटली. तिचं बाळ दगावलं. ती फार दुःखात होती. नांदेड, छत्रपती संभाजीनगर, ठाण्यात अशाच घटना घडत आहेत. पालकमंत्री पदासाठी हे लोक दिल्लीपर्यंत जातात. मग इथे का येत नाहीत? सर्वसामान्य जनतेची हत्या या खोके सरकारने केली आहे. खोके सरकार घरं फोडण्यात मग्न आहे. मात्र लोकांच्या प्रश्नांकडे यांचं लक्ष नाही, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.

Follow Us
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....