AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Jayant Patil on Ajit Pawar Group MLA : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं ते म्हणालेत. जातीय जनगणनेविषयी त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. जयंत पाटील नेमकं काय म्हणालेत? पाहा...

अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात; जयंत पाटील यांचा मोठा दावा
| Updated on: Oct 05, 2023 | 2:53 PM
Share

पुणे | 05 ऑक्टोबर 2023, प्रदीप कापसे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अत्यंत मोठा दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. अजित पवारांकडे गेलेल्या आमदारासोबत माझी चर्चा झाली. त्यांनी मला त्यांची भूमिका सांगितली आहे. ते म्हणाले की, आम्ही मनापासून आम्ही शरद पवारांसोबत आहोत. आता थोडा दबाव आहे म्हणून आम्ही इकडे राहतोय. पण आतून आम्ही पवारसाहेबांसोबतच आहोत. जे दिसतं तसं नाही. खरी परिस्थिती वेगळी आहे. ते लोक आमच्यासोबत आहेत, असं जयंत पाटील म्हणालेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

आगामी निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रातील कोणत्याही लहान मुलांना जरी विचारलं. तरी ती मुलं सांगतात की शरद पवार यांचंच सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. या सरकारचा फक्त सहा महिन्याचा खेळ उरला आहे.लोकसभा निवडणूक झाल्यानंतर परिस्थिती बदलणार आहे. देशात महागाई, बेरीजगारीसारखे मुद्दे आहेत. याकडे सरकारचं लक्ष नाही. मणिपूर हिंसाचारावर हे बोलत नाहीत. या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष्य करुन मोठ्या पक्षांना तोडण्याचं काम सध्या केलं जातंय, असं जयंत पाटील म्हणालेत.

महाराष्ट्रात लोकांनी ठरवलय भाजपला हटवायचं. पक्ष तोडून आमच्या लोकांना त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आमच्यावर आरोप केला. आमच्यातले काही लोक तोडून त्यांच्यासोबत नेले. पण जनता आमच्यासोबत आहे. शरद पवारांच्या बाजूने महाराष्ट्रातील 80 % लोकांनी अॅफिडेव्हिट दिलं आहे. 24 राज्यात आमचं संघटन आहे. पक्ष आमचा आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्षासंदर्भातत जो निर्णय दिला. त्यात स्पष्ट केलं की, आमदाराच्या पाठीमागे पक्ष जाऊ शकत नाही, पक्ष हा आपल्या जागेवरच असणार आहे. हेच राष्ट्रवादीच्या बाबतीत पण होणार आहे. उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणीत योग्य निर्णय येईल, अशी अपेक्षा करतो, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

जातीनिहाय जनगणन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे संपूर्ण देशात होणं गरजचे आहे. त्यामुळे मागास जातींना न्याय मिळेल, असं म्हणत जातीय जनगणनेवर जयंत पाटील यांनी भाष्य केलं.

Follow Us
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता.
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान.
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड.
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.