AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“असे शब्द ‘सामना’ नेहमी वापरतो, मग पेपर जेलमधून काढायचा का?”

नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर आता भाजप नेते चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वेळ आल्यावर करारा जवाब मिलेगा, असा सूचक इशाराच शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिलाय.

असे शब्द 'सामना' नेहमी वापरतो, मग पेपर जेलमधून काढायचा का?
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
| Edited By: | Updated on: Aug 25, 2021 | 5:50 PM
Share

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना महाडमध्ये प्रथव वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीनही मंजूर केला. मात्र, नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर आता भाजप नेते चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी वेळ आल्यावर करारा जवाब मिलेगा, असा सूचक इशाराच शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिलाय. नारायण राणे यांना अटक ही लोकशाहीची हत्या असल्याचा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केलाय. ते आज नागपुरात बोलत होते. (Sudhir Mungantiwar warns Shiv Sena after Narayan Rane’s arrest)

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये अशाप्रकारचे शब्द नेहमी वापरले जातात, मग सामना पेपर जेलमधून काढायचा का? असा खोचक सवालही मुनगंटीवार यांनी शिवसेनेला विचारलाय. सत्ता काही दिवस तुमच्याकडे आहे. सत्ता तालीबानी झालीय, सत्ता फार काळ टिकणार नाही. राणेंचा शब्द योग्य नव्हता तर वेगळेही मार्ग होती. फडणवीसांच्या तोंडात कोरोना टाकू, थोबाडीत मारु हे शब्द कुणाचे होते? असा सवालही मुनगंटीवारांनी केलाय. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बदल्याच्या भावनेने तक्रार करणं हे भाजपचं काम नाही. भाजप जनहिताचं काम करतो, असा दावाही मुनगंटीवार यांनी केलाय.

कालची घटना संविधानाच्या जिव्हारी लागलीय. वक्त है, बबूल के बिज बोये तर त्याची व्याजासकट परतफेड होत असते. सत्ता बदलण्याचं काम भाजप नाही जनता करणार. भाजपची रणनिती कुण्या पत्राविरोधात नाही, तर महाराष्ट्राच्या हिताची आहे, असंही मुनगंटीवार म्हणालेत.

राणेंच्या अटकेची CBI चौकशी करा – शेलार

“केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी मंत्री अनिल परब यांनी दबाव टाकला. त्यांनी काल गृहखात्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तसंच कोर्टाच्या निर्णायाआधी त्यांनी जामीनाचा निवाडा घोषित केला. यातून मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान झाला. हे सगळं प्रकरण संशयित आहे. त्यामुळे दबाव टाकणाऱ्या मंत्र्यासह IPS अधिकाऱ्यांची CBI चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

विनायक राऊत म्हणतात, ‘मग त्यात गैर काय?’

परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी काल नारायण राणे यांना अटक होण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर पत्रकार परिषद घेतली. याच पत्रकार परिषदेतली एक क्लिप व्हायरल झाली ज्यामध्ये ते राणेंच्या अटकेसाठी पोलिसांना सूचना करत होते. यावर भाजपने आक्षेप नोंदवत हा मातोश्रीवरुन सगळा प्लॅन ठरला होता. आता परब यांना आम्ही कोर्टात खेचणार आहोत, अशी आक्रमक भूमिका चंद्रकांत पाटील यांनी घेतली. त्यावरच विनायक राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. ‘परब यांनी पोलिसांना सूचना दिल्या असतील तर त्यात गैर ते काय?, असा प्रतिसवाल त्यांनी केला आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO : आता भाजपनेही उद्धव ठाकरेंनी केलेलं ‘थोबाड फोडणारं’ वक्तव्य शोधलं, 5 पोलीस ठाण्यात तक्रारी देणार

मुख्यमंत्र्यांचं अज्ञान, अनिल परबांचा दबाव, राणेंच्या अटकेमागची CBI चौकशी करा, Video दाखवून भाजपची मागणी

Sudhir Mungantiwar warns Shiv Sena after Narayan Rane’s arrest

Follow Us
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!
शेतकरी कर्जमाफीवरून इम्तियाज जलील यांनी सरकारला धरलं धारेवर!.
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?
आजोबा पेक्षा नातू श्रीमंत!प्रतिज्ञापत्रात पार्थ पवारांची संपत्ती किती?.
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?
रोहित पवारांच्या कारखान्यामुळे अजित पवारांचा विमान अपघात?.
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.