AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे सरकारने चेष्टा लावलीय, लोकल सुरु करुन काय करणार? राष्ट्रपती राजवट मागणीवर ठाम : राणे

लॉकडाऊन जसा हाताळला गेला पाहिजे, तसा तो होत नाही. लोकल सेवा सुरु करुन काय करणार? असा सवाल उपस्थित करत संक्रमण आणखी वाढण्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली. (Narayan Rane Exclusive Interview on Corona Lockdown Cyclone Nisarga)

ठाकरे सरकारने चेष्टा लावलीय, लोकल सुरु करुन काय करणार? राष्ट्रपती राजवट मागणीवर ठाम : राणे
| Updated on: Jun 11, 2020 | 1:28 PM
Share

सिंधुदुर्ग : फक्त फेरफटका मारुन होत नाही, राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेल्या मदतीचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी केली आहे. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे, लोकल सुरु करुन काय करणार? असं विचारत राष्ट्रपती राजवट लावण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं राणे म्हणाले. (Narayan Rane Exclusive Interview on Corona Lockdown Cyclone Nisarga)

“निसर्ग चक्रीवादळ झालं, तेव्हा मी तिथेच होतो. मी नुकसान पाहिलं आहे. राज्य सरकारने ‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांना दिलेली मदत पुरेशी नाही. रायगड, रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना झालेली मदत तुटपुंजी आहे. आर्थिक स्थिती वाईट असली तरी सरकारने मदतीचा फेरविचार करावा. लोकांना जास्तीत जास्त मदत करावी” अशी मागणी नारायण राणे यांनी केली.

“सिंधुदुर्गाला 25 कोटीची मदत दिली, पण यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विविध योजनांतील 200 कोटी परत घेतले. ठाकरे सरकारने चेष्टा लावली आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसू नका. मच्छीमारांचं नुकसान झालं आहे. फक्त फेरफटका मारुन काही होत नाही” असा प्रहारही राणेंनी केला. केंद्राकडे आम्ही भरीव मदतीसाठी मागणी करू, असंही ते म्हणाले.

हेही वाचा : ठाकरे सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा, राणेंची राज्यपालांकडे मागणी

लॉकडाऊन जसा हाताळला गेला पाहिजे, तसा तो होत नाही. लोकल सेवा सुरु करुन काय करणार? असा सवाल उपस्थित करत संक्रमण आणखी वाढण्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली.

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या काही कमी होताना दिसत नाही. सरकारने कमी करुन दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते उघडे पडतील. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागणीवर आपण ठाम असल्याचा पुनरुच्चार नारायण राणे यांनी केला.

सरकारला खर्च करायचा असेल, तर पुरवण्या मागण्या मान्य करुन घ्यायला पाहिजेत. त्यासाठी एक दिवासाचं अधिवेशन बोलावायला हवं, अशी मागणी नारायण राणे यांनी केली. विरोधी पक्षाला सामोरं जायला जी ताकद लागते, ती सत्तारुढ पक्षामध्ये नसल्याची टीकाही नारायण राणे यांनी केली.

(Narayan Rane Exclusive Interview on Corona Lockdown Cyclone Nisarga)

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.