सिंधुदु्र्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अटक आणि त्यानंतर मिळालेला जामीन या घटनाक्रमामुळे भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेत दोन दिवस खंड पडला. मात्र, नारायण राणे यांच्या नेतृत्वात सुरु झालेली जन-आशीर्वाद यात्रा उद्यापासून पुन्हा त्याच उत्साहाने सुरु करणार असल्याची घोषणा खुद्द नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केलीय. त्यानंतर आता शिवसेनेनं जर जन-आशीर्वाद यात्रेला विरोध केला तर जशास तसं उत्तर देणार, असा इशारा कोकण जन-आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिलाय. त्यामुळे भाजपच्या जन-आशीर्वाद यात्रेवरुन पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमधील वाद उफाळून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (BJP leader Pramod Jathar warns ShivSena on Jana Aashirwad Yatra,)