AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकली : नवाब मलिक

सत्तेत जाण्याआधी संविधानाच्या चौकटीत राहून काम करण्याचं शिवसेनेकडून लिहून घेतल्याचा दावा अशोक चव्हाणांनी काल केला होता

अशोक चव्हाणांची बोलण्याची पद्धत चुकली : नवाब मलिक
| Updated on: Jan 28, 2020 | 12:14 PM
Share

मुंबई : सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांची बोलण्याची पद्धत चुकली आहे. सरकार स्थापन करताना आम्ही शिवसेनेकडून काहीही लिहून घेतलेलं नाही, असं स्पष्टीकरण अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी (Nawab Malik on Ashok Chavan) दिलं आहे.

महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही सह्या आहेत, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं. सत्तेत जाण्याआधी संविधानाच्या चौकटीत राहून काम करण्याचं शिवसेनेकडून लिहून घेतल्याचा दावा अशोक चव्हाणांनी काल केला होता, त्यानंतर मलिक यांनी अशोक चव्हाणांना उत्तर दिलं.

घटनेच्या चौकटीत राहून सरकार काम करेल, असं लेखी आश्वासन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेनेकडून मागितलं होतं. जे सरकार स्थापन होईल ते घटनेच्या चौकटीत काम करेल, असं आश्वासन शिवसेनेकडून घेण्यास त्यांनी सांगितल्याचा दावा अशोक चव्हाण यांनी केला होता. आपण तीन पक्षाच्या सरकारच्या किमान समान कार्यक्रमाबद्दल बोललो, हा कार्यक्रम संविधानाला अनुसरुन तयार केलेला आहे. त्याप्रमाणे सरकारचं काम चाललं पाहिजं, अशी आपली भूमिका असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं होतं.

भुजबळांकडून दुजोरा

अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाला अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही दुजोरा दिला होता. “शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत होती, तेव्हा वेळ लागणार होता. त्यावेळेस तुम्ही सगळे तक्रार करत होतात. तसेच, लोकशाही मार्गाने सर्व काही झालं पाहिजे असं मत होतं, हे शिवसेनेनं मान्य केलं आहे”, असं छगन भुजबळ म्हणाले होते.

शब्दशः अर्थ नको

“अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडी विषयी केलेल्या वक्तव्याचा शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही. आम्ही विचाराने एकत्र आलो आहोत. त्यामुळे विचारानेच बांधले गेलो आहोत”, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले होते.

“असं कुणी लिहून घेत नसतं. अशोक चव्हाण सहज बोलले असतील. हे सरकार पाच वर्षे टिकावं, अशी शिवसेनेसह सर्वांची इच्छा आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल”, असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला होता.

Nawab Malik on Ashok Chavan

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.