तीन पक्षांनी एकत्र यावं ही माझी 2014 पासूनची इच्छा, पण तेव्हा पवारांनी जनमताचा विचार केला : नवाब मलिक

नवाब मलिक यांनी आज (29 नोव्हेंबर) 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली (Nawab Malik said I wanted three parties to come together since 2014).

तीन पक्षांनी एकत्र यावं ही माझी 2014 पासूनची इच्छा, पण तेव्हा पवारांनी जनमताचा विचार केला : नवाब मलिक
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 3:47 PM

मुंबई : “तीन पक्षांनी एकत्र यावं, अशी माझी 2014 साला पासूनची इच्छा होती. मी याबाबत आधीच सांगितलं होतं. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तेव्हा भाजपला दिलेल्या जनमताचा विचार केला. त्यामुळे भाजपचं सरकार बनलं”, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला. त्यांनी आज (29 नोव्हेंबर) ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली (Nawab Malik said I wanted three parties to come together since 2014).

“भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पोपट झाले. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भविष्यवाणी करायला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस हे मामू, माजी मुख्यमंत्र्यांनाही काहीतरी बोलावच लागेल ना? पण भाजपला सत्तेशिवाय राहता येत नाही. सध्या भाजपची गोच्ची होतेय. जे भाजपमध्ये आहेत, ते सोडून जायला तयार आहेत”, असा घणाघात नवाब मलिक यांनी केला.

“शेतकऱ्यांची हमीभावाच्या कायद्यात अंतरभूत करण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शब्दावर विश्वास का ठेवावा? काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलले शेतकऱ्यांना चर्चेला बोलावलं. पण चार महिने सरकार गप्प का बसले? भाजप शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणं योग्य नाही, मोदी सरकारचं काही खरं नाही”, अशी टीका मलिक यांनी केली.

“केंद्रीय यंत्रणांचा मोदी सरकार गैरवापर करत आहे. जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. मागच्या निवडणुकांमध्ये उत्तर मिळालं. पण पुढच्या निवडणुकीतही मिळेल. राज्य सरकार कुणाला घाबरत नाही. जेवढी कारवाई होईल त्याला नेते आणि पक्ष कार्यकर्ते जोमाने उत्तर देतील. तितक्यात जोमानं काम करतील”, अशी भूमिका नवाब मलिक यांनी मांडली (Nawab Malik said I wanted three parties to come together since 2014).

हेही वाचा : …तेव्हा पोपट घेऊन चंद्रकांत पाटील चिठ्ठ्या काढत होते; नवाब मलिक यांचं टीकास्र

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.