AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं ही कुणाची मेहरबानी नव्हती; सुनील तटकरे यांचा कुणावर निशाणा?

tv9 मराठीच्या 'लोकसभेचा महासंग्राम' या विशेष कार्यक्रमात सुनील तटकरे यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहे. तटकरे यांनी भाजपला पाठिंबा देण्यामागे अजित पवार आणि बाकी आमदारांची काय भुमिका होती अशा अनेक प्रश्नांवर गोपनिय माहिती दिली आहे.

अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं ही कुणाची मेहरबानी नव्हती; सुनील तटकरे यांचा कुणावर निशाणा?
सुनील तटकरेImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Mar 01, 2024 | 12:13 PM
Share

मुंबई : अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हल्ली लोक फार मोठं समजण्याच्या नावाखाली काहीही बोलतात. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं ही मेहरबानी नव्हती. अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद दिलं नसतं तर महाविकास आघाडीचं सरकार आठ दिवसही टिकलं नसतं, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला आहे. सुनील तटकरे यांनी केलेल्या या विधानामुळे राजकारणात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. tv9 मराठीच्या ‘लोकसभेचा महासंग्राम’ या विशेष कार्यक्रमात सुनील तटकरे पुढे म्हणाले की, मी हा दावा व्यासपीठावर करतो, कारण आमदारांच्या मनात दादांचा निर्णय योग्य होता. तीन पक्षाच्या सरकार पेक्षा दोन पक्षाचं सरकार हवं होतं. दादा आणि देवेंद्र जींचं सरकार चांगलं ठरलं असतं हे आमदारांना वाटत होतं.

सर्वोच्च न्यायालयाचा हेडकाऊंटचा निर्णय आला नसता तर निकाल वेगळा लागला असता. परिस्थिती वेगळी झाली असती. दादांना उपमुख्यमंत्री केलं नसतं तर आमदारांच्या मनातील स्फोट झाला असता. मनी बिल आल्यावर गुप्त मतदान होतं. अशावेळी काहीही घडलं असतं. जे घडतंय ते ओळखून अजितदादांची गरज ओळखून पक्षनेतृत्वाने त्यांना उपमुख्यमंत्री केलं. अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं ही कुणाची मेहरबानी नव्हती. पक्षाच्या अस्तित्वासाठीचा तो निर्णय होता, असं सुनील तटकरे म्हणाले.

तो पहाटेचा शपथविधी नव्हता

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पहाटेचा शपथविधी का राजकिय दृष्ट्या कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ती पहाटेची शपथ नव्हीत. ती 8 वाजेची शपथ होती. लख्ख प्रकाशात झाली. भाजपासोबत जाण्याची चर्चा ही 2014 पासूनच होती. पक्ष नेतृत्त्वाचा 2014ला भाजपाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाला होता, तसेच 2016-17 मध्येही भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला होता अशी अंतर्गत माहिती माहिती तटकरे यांनी टिव्ही 9 च्या कार्यक्रमात दिली.  काळाच्या ओघात त्याची उत्तरे मिळतील. काळ हेच उत्तर आहे. असं म्हणत काही प्रश्नांवर रहस्य कायम ठेवले.

Follow Us
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं
राहुल गांधींनी एपस्टाईन फाइल्सचा विषय काढताच प्रकरण तापलं.
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय
देशात गॅसची टंचाई, सध्या स्थिती काय? सरकार नेमकं काय खबरदारी घेतंय.
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी
तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार सज्ज; नेमका काय काय खबरदारी.
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?
भारताने कुणाकडून तेल घ्यायचं हे अमेरिका का ठरवेल?.
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत...
हार्दिक पांड्यांच्या अडचणीत आणखी वाढ, गर्लफ्रेंडसोबत....
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?
लोकसभेत आज गॅस तुटवड्यावर चर्चा, राहुल गांधी केंद्र सरकारला घेरणार?.
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव
केंद्राने व्यावसायिक गॅसचा पुरवठा रोखला... या कंपनीची कोर्टात धाव.
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज
गुड न्यूज... टेन्शनच मिटलं, सौदीतून मुंबईत आलं कच्च्या तेलाचं जहाज.
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच....
हॉटेल, कॅटरर्स बंद, उपासमारीची वेळ; गॅस सिलेंडरचा पुरवठाच.....
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस
1 हजार 900 रुपयांचं सिलेंडर 4500 रुपयांना, ठाण्यात काळाबाजाराचा हैदोस.