AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Satara Rain Speech | भरपावसातील शरद पवारांच्या सभेची वर्षपूर्ती, राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचलं

जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली' अशा शब्दात राष्ट्रवादीने सोशल मीडियावर शरद पवारांच्या सभेतील क्षणचित्रं शेअर केली आहेत.

Sharad Pawar Satara Rain Speech | भरपावसातील शरद पवारांच्या सभेची वर्षपूर्ती, राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचलं
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Oct 18, 2020 | 11:03 AM
Share

बारामती :शरद पवारांचं पावसातील भाषण‘ हे चार शब्द महाराष्ट्राच्या राजकारणाशी चिरपरिचित असलेल्या कोणालाही ‘ते’ भाषण आठवून देण्यास पुरेसं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या (Satara Loksabha Bypoll) पार्श्वभूमीवर घेतलेल्या ‘न भूतो न भविष्यति’ अशा या सभेला (Sharad Pawar speech in Rain at Satara) एक वर्ष पूर्ण झालं. उभ्या पावसात न थांबता, न थकता, पावसाच्या धारा परतवून लावत पवारांशी उपस्थितांशी संवाद साधला होता. राष्ट्रवादीनेही ‘जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’ असं म्हणत वर्षपूर्तीनिमित्त भाजपला पुन्हा चिमटे काढले आहेत. (NCP pinches BJP after one year of Sharad Pawar speech in Rain at Satara)

‘त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, #शरदपवार संपले. पण 18 ऑक्टोबर 2019 रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला. जनता चिंब भिजली, दिल्ली मात्र थिजली’ अशा शब्दात राष्ट्रवादीने सोशल मीडियावर शरद पवारांच्या सभेतील क्षणचित्रं शेअर केली आहेत.

साताऱ्यात 18 ऑक्टोबर रोजी शरद पवार यांचं भाषण आयोजित करण्यात आलं होतं. मंचावर पवार राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंवर बरसत होते, आणि अचानक पाऊस बरसण्यास सुरुवात झाली.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेले साताऱ्याचे तत्कालीन लोकसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. ‘चूक झाली तर ती चूक कबूल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली’ असं शरद पवार यांनी जाहीरपणे कबूल केलं. तसंच ही चूक दुरुस्त करण्याची संधी 21 ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी आहे, असं सांगत सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन केलं होतं.

विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पायाला जखम झालेली होती. अशा स्थितीतही त्यांनी पाऊस कोसळत असताना भाषण सुरु ठेवलं. ऐशी वर्षांच्या योद्ध्यावर फक्त राष्ट्रवादी समर्थकांनीच स्तुतिसुमनं उधळली, अशातील भाग नाही, तर भाजप वगळता इतर पक्षातील दिग्गज नेते, सर्वसामान्य नागरिकांनीही सोशल मीडियावर कौतुक केलं.

विशेष म्हणजे पवारांचं आवाहन साताऱ्यातील जनतेने मनावर घेतलं. भाजपच्या तिकीटावर लोकसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उदयनराजेंना दणदणीत पराभव झाला. तर श्रीनिवास पाटील मोठ्या मताधिक्याने लोकसभेवर निवडून गेले. हा पराभव उदयनराजेंच्याही जिव्हारी लागला होता. भाजपने यथावकाश त्यांचं राज्यसभेवर पुनर्वसन केलं. मात्र भर पावसातील शरद पवारांची ऐतिहासिक सभा उदयनराजे आणि भाजपला मोठी जखम देऊन गेली. (NCP pinches BJP after one year of Sharad Pawar speech in Rain at Satara)

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

पायाला जखम, भरपावसात भाषण, पाऊस कोसळला, पवार उदयनराजेंवर बरसले 

शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा

(NCP pinches BJP after one year of Sharad Pawar speech in Rain at Satara)

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?