AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांनी उडवली मोदी गॅरंटीची खिल्ली; पवार म्हणाले…

गेले काही दिवस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता अस्वस्थ होता. पक्ष मजबूत करावा अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये होती. त्याला मूर्तरुप देण्यासाठी प्रांताध्यक्षांनी दोन दिवसाचं शिबीर घेण्याचा निर्णय घेतला. कालपासून आपण सर्व या ठिकाणी एकत्रित आहोत. या ठिकाणी अनेकांचे विचार आपण ऐकले. अनेकांची भाषण ऐकली. प्रत्येकाचं भाषण अत्यंत उत्तम होतं. लहान कार्यकर्ता असो, विचारवंत असो, निमंत्रित असो, त्या भाषणातून एक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार यांनी उडवली मोदी गॅरंटीची खिल्ली; पवार म्हणाले...
sharad pawarImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jan 04, 2024 | 5:34 PM
Share

नाशिक | 4 जानेवारी 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोदी गॅरंटीची खिल्ली उडवली आहे. केंद्र सरकारच्या सर्व योजना फसव्या ठरल्या आहेत. सर्व योजना हवेत आहेत. या योजना प्रत्यक्षात आल्याच नाहीत, असं सांगतानाच मोदींची गॅरंटी वगैरे सांगितलं जात आहे. पण मोदी गॅरंटी काही खरी नाही, असा जोरदार हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे. भाजप हा हिटलरच्या गोबेल्स नीतीचा अवलंब करून खोटा प्रचार करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला आहे.

शिर्डीत दोन दिवसाचं राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यकर्ता शिबीर सुरू आहे. या शिबीराचा समारोप करताना शरद पवार यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सत्ता आल्यानंतर भाजपने अनेक कार्यक्रम हाती घेतले. प्रत्यक्षात अंमलबजावणी न करता लोकांची फसवणूक करण्याचं काम भाजपने केलं. ते लोकांच्या लक्षात आलं आहे. मोदी संसदेत क्वचितच येतात. एखाद्या धोरणाची मांडणी अशी करतात की खासदारही थक्क होतात. घोषणाही खूप करतात. 2016 आणि 2017चा अर्थसंकल्प संसदे मांडला. त्या बजेट स्पीचमध्ये असं सांगितलं की, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू. आज 2024 आहे. काहीच केलं नाही. मोदी एक दिवशी म्हणाले, 2022पर्यंत शहरी भागातील लोकांना पक्की घरं देऊ. पण ही घोषणा हवेतच राहिली. माझी गॅरंटी आहे, असं मोदी वारंवार सांगतात. पण ती गॅरंटी काही खरी नाही. याचा अनुभव हा अनेकवेळेला आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली.

मागणी केली म्हणून निलंबन

देशाची नवी पिढी ही अस्वस्थ आहे. ती काम मागत आहे. काम मिळत नाही म्हणून अस्वस्थ आहे. पार्लमेंटमध्ये काही लोक घुसले. तरुण होते. त्यांच्या हातात गॅस सिलिंडर होते. ते मागण्या करत होते. नंतर त्यांना पकडलं. आपल्या खासदारांनी मागणी केली हे तरुण कोण होते? का आले? त्यांची मागणी काय आहे? त्याची माहिती द्या. गृहमंत्र्यांनी सांगावं. पण त्याला संमती दिली नाही. विरोधी पक्षाच्या खासदारांनी मागणी केली. त्यामुळे खासदारांना निलंबित केले. त्यात आपल्याही खासदारांचा समावेश आहे, असं पवार म्हणाले.

देशात अस्वस्थता

आज अस्वस्थता आहे. त्याचं कारण संबंध देशाचं चित्र वेगळं आहे. आज भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात सत्ता आहे. आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी प्रत्येक राज्यात उभी केली आहे. त्या आक्रमक प्रचार यंत्रणेतून त्यांचा प्रचार सुरू असतो. जसं हिटलरने जर्मनीत गोबेल्स नीतीची चर्चा होती. त्यावर आधारीत असलेल्या अनेक गोष्टी जनमाणसात पेरण्याचं काम भाजपकडून सुरू आहे. त्यामुळे लोकही अस्वस्थ आहेत, असं पवार म्हणाले.

भाजपला अनुकूल चित्र नाही

देशाचं चित्र पाहिलं तर चित्र भाजपला अनुकूल नाही. याचा उल्लेख सुप्रिया आणि इतरांनी केलाय. सातत्याने सांगितलं जातं, 450 जागा जिंकणार. काय स्थिती आहे? केरळमध्ये कम्युनिस्ट आणि काँग्रेसचं राज्य आहे. भाजप नाही. तामिळनाडूत भाजप नाही. आंध्रात भाजप नाही, पश्चिम बंगालमध्ये नाही. झारखंडमध्ये नाही. दिल्लीत भाजप नाही. पंजाबमध्ये भाजप नाही. काही ठिकाणी भाजप आहे. पण तो स्वत:च्या ताकदीवर नाही. गोव्यात काँग्रेस आणि मित्र पक्षाचं राज्य होतं. काही आमदार फोडले आणि गोव्याचं सरकार आलं. तीन राज्याच्या निवडणुका होण्याआधी मध्य प्रदेशात कमलनाथ यांचं सरकार होतं. पण आमदार फोडले आणि त्यांचं सरकार आलं. त्यामुळे तसं चित्र त्यांच्या बाजूने नाही. ते 450 म्हणो की 500 म्हणो, पण त्यांना अनुकूल चित्र नाही, असा दावा पवार यांनी केला.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार