AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धनगर समाज मतं दुसऱ्याला देतो, आरक्षण मात्र मी द्यायचं का? : शरद पवार

पंढरपूर : धनगर आरक्षण हा प्रमुख राजकीय पक्षासाठी निवडणुकीत मुद्दा ठरला आहे. धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्याची मागणी आम्हाला करता आणि मतं दुसऱ्यांना देता, हे बरं नव्हं, अस वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. करमाळ्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. […]

धनगर समाज मतं दुसऱ्याला देतो, आरक्षण मात्र मी द्यायचं का? : शरद पवार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM
Share

पंढरपूर : धनगर आरक्षण हा प्रमुख राजकीय पक्षासाठी निवडणुकीत मुद्दा ठरला आहे. धनगर आरक्षण प्रश्न सोडवण्याची मागणी आम्हाला करता आणि मतं दुसऱ्यांना देता, हे बरं नव्हं, अस वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. करमाळ्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रश्मी बागल यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

यावेळी धनगर समाजाच्या नेत्यांनी भाषणात शरद पवारच धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकतात ही आशा व्यक्त केली. यानंतर भाषणात शरद पवार म्हणाले, धनगर समाज मतं दुसऱ्याला देतो आणि आरक्षणाचा प्रश्न मात्र मी सोडवायचा, हे वागणं बरं नव्हं, असं बोलत 2014 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत धनगर समाजाने साथ सोडल्याची खंत व्यक्त केली.

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोले लगावले. मुख्यमंत्री होण्याआधी फडणवीस यांचं नाव कुणाला तरी माहिती होत का? असा प्रश्न लोकाना विचारला. मुख्यमंत्री शेतात गेल्यानंतर भुईमुगाचा वेल बघून याला शेंगा  का आल्या नाहीत असं विचारतात. शेंगा जमिनीखाली असतात एवढही यांना माहिती नाही, असं सांगत मुख्यमंत्र्यांचे शेती प्रश्नाचे अज्ञान सांगितले.

नगरची जागा काँग्रेसला सोडणार, पवारांची घोषणा

काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातला सर्वात मोठा तिढा जवळपास मिटलाय. कारण, ज्या अहमदनगरच्या जागेसाठी आतापर्यंत चर्चा सुरु होती, ती जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकलूजमध्ये बोलताना याबाबत घोषणा केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे या जागेसाठी उत्सुक आहेत. ही जागा आमच्यासाठी सोडावी, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात होती. कारण, आघाडीत ही जागा राष्ट्रवादीची आहे.

व्हिडीओ पाहा : शरद पवारांनी हात पकडला, तरीही शेखर गोरे ऐकेनात, राष्ट्रवादीच्या बैठकीत गोंधळ

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं