AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“महाराष्ट्राचं नुकसान अन् गुजरातचं हित, एक दिवस मुंबईसुद्धा गुजरातला देऊन टाकतील!”

महाराष्ट्रातील उद्योग राज्यबाहेर जात आहेत. यावर राष्ट्रवादीच्या वतीने टीका करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचं नुकसान अन् गुजरातचं हित, एक दिवस मुंबईसुद्धा गुजरातला देऊन टाकतील!
| Updated on: Oct 31, 2022 | 1:22 PM
Share

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग राज्यबाहेर जात आहेत. वेदांता, टाटाएअर बससारखा प्रकल्प राज्याबाहेर गेला. महाराष्ट्रातील तरुणांना मिळणारा उद्योग त्यामुळे कमी झाला. यासगळ्याला विरोध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पुण्यात आंदोलन करण्यात आलं. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली.”महाराष्ट्राचं नुकसान अन् गुजरातचं हित हेच शिंदे-फडणवीस सरकारचं धोरण आहे. शिंदे-फडणवीस एक दिवस मुंबईसुद्धा गुजरातला देऊन टाकतील!” असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे (Ravikant varpe) यांनी टीका केली आहे.

घे ठेका, दे खोका असं शिंदे फडणवीस सरकार आहे. महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्तातरानंतर स्थापन स्थापन झालेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत, अशा शब्दात रविकांत वरपे यांनी ही टीका केली आहे.

महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे. दुर्देवाने यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राच्या हित डावलून मोदींच्या गुजरातला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्वातील मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स अशा अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले, असं वरपे म्हणालेत.

राज्यात सरकार बदलल्यापासून चार महिन्यात चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. तरुणांचं भविष्य अंधकारमय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने केलं आहे.50 खोके घेऊन तुमच्या 50 आमदारांचं पुनर्वसन करण्यासाठी नरेंद्र मोदींना तुम्ही हा महाराष्ट्र तुम्ही आंदण म्हणून दिलाय का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा डाव मोदी सरकारच्या माध्यमातून हे ईडी सरकार करतंय हे महाराष्ट्रातील तरुणांनी समजून घेतलं पाहिजे, असंही वरपे म्हणालेत.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.