माजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी, चांगल्या प्रवृत्तीच्या नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न, जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य

राष्ट्रवादीकडून 2004 मध्ये रमेश कदम चिपळूणचे आमदार झाले, मात्र भास्कर जाधवांसोबत मतभेदानंतर 2009 मध्ये त्यांनी शेकापच्या तिकिटावर सुनील तटकरेंविरोधात रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

माजी आमदार रमेश कदमांची राष्ट्रवादीत घरवापसी, चांगल्या प्रवृत्तीच्या नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न, जयंत पाटलांचे सूचक वक्तव्य
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 4:37 PM

मुंबई : रत्नागिरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश कदम यांची पक्षात घरवापसी झाली. राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर शेकाप-भाजप-काँग्रेस असा झालेला त्यांचा राजकीय प्रवास अखेर वर्तुळाकृती होऊन राष्ट्रवादीतच पूर्ण झाला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रमेश कदम यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. (NCP’s former MLA Ramesh Kadam returns to party)

“राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून रमेश कदम यांचे पक्षाला पाठबळ लाभले. काही कारणांमुळे मधल्या काळात ते वेगळे झाले. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक निवडणुकांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोकणात आता पक्ष मजबुतीसाठी त्यांच्यासह पुन्हा जोमाने कामास सुरुवात करु” अशा भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केल्या.

“अनेक मान्यवरांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण राजकारण हे बेरजेचे करायचे वजाबाकी, भागाकाराचे नाही. पक्ष बळकट करण्यासाठी आपले चौफेर प्रयत्न सुरु आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची अनेकांची इच्छा आहे. पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांनीही घरवापसीची इच्छा प्रकट केली आहे. त्यामुळे सर्व चांगल्या प्रवृत्तीचे लोक पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत” असे संकेत यावेळी जयंत पाटील यांनी दिले.

रमेश कदम यांचा राजकीय प्रवास

रमेश कदम यांनी चिपळूणचे नगराध्यक्षपद भूषवले आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर कदम यांनी 1999 मध्ये काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून 2004 मध्ये ते चिपळूणचे आमदार झाले. मात्र भास्कर जाधव यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले होते.

रमेश कदमांनी 2009 मध्ये शेकापच्या तिकिटावर रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. कदम यांनी थेट राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनाच आव्हान दिले होते. काही काळातच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र अवघ्या आठच महिन्यात त्यांनी भाजपला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला. मात्र जिल्हाध्यक्ष पदावरुन बाजूला केल्याने ते काहीसे नाराज होते.

दरम्यान, रमेश कदम यांच्यासह भाजपातून आलेले उस्मान मोमीन, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शशिकांत मोकल आणि उषा चौधरी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले. (NCP’s former MLA Ramesh Kadam returns to party)

परभणीचे माजी आमदार सीताराम घनदाट यांचा काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश झाला होता. तर त्याआधी नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता.

संबंधित बातम्या :

अजित पवारांच्या उपस्थितीत भाजपचा माजी आमदार ‘व्हाया काँग्रेस’ राष्ट्रवादीत

आणखी एक माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला, अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

(NCP’s former MLA Ramesh Kadam returns to party)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.