AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CBI चं पथक रत्नागिरीत आल्यावरच पोलीस अधीक्षकांना कोरोना कसा झाला? निलेश राणेंचा सवाल; गर्ग यांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित

CBI चं एक पथक रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहे. मात्र, हे पथक आल्यावरच पोलीस अधीक्षकांना (Superintendent of Police) कोरोना कसा काय झाला? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय.

CBI चं पथक रत्नागिरीत आल्यावरच पोलीस अधीक्षकांना कोरोना कसा झाला? निलेश राणेंचा सवाल; गर्ग यांच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित
निलेश राणे, मोहित कुमार गर्गImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 31, 2022 | 9:06 PM
Share

रत्नागिरी : जिल्हाचे पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग (Mohit Kumar Garg) यांच्यावर मनमानीचा कारभाराचा आरप करत भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) चांगलेच आक्रमक बनलेत. CBI चं एक पथक रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहे. मात्र, हे पथक आल्यावरच पोलीस अधीक्षकांना (Superintendent of Police) कोरोना कसा काय झाला? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलाय. तसंच संबंधित यंत्रणेला गर्ग यांच्या मनमानी कारभाराची माहिती देणार असल्याचंही निलेश राणे म्हणाले. मोहितकुमार गर्ग यांच्या कार्यपद्धतीबद्दल निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील वादग्रस्त रिसॉर्टच्या केसमध्ये गर्ग यांच्या भूमिकेवर निलेश राणे यांनी सवाल उपस्थित केले होते. तर काही दिवसांपूर्वी दापोली पोलीस स्थानकाला लागलेल्या आगीबद्दल विविध संशय व्यक्त करतानाच मोहितकुमार गर्ग सातत्याने दापोलीत का असतात? सरकारी निवासव्यवस्था नाकारून गर्ग यांच्या खासगी निवासस्थानाचा खर्च कोण भागवते? दापोली पोलीस स्थानकाला आग लागल्यानंतर गर्ग थोड्या वेळातच तिथे कसे काय पोहोचले? रत्नागिरीतील त्यांच्या केबिनच्या नूतनीकरणाचा खर्च कोण करतोय? असे सवाल उपस्थित करून खळबळ उडवली आहे.

‘SP आहात म्हणून मनमानी चालणार नाही’

त्यानंतर आता निलेश राणे यांचे ट्विट रत्नागिरी जिल्ह्यात चर्चेत आले आहे. ”मागच्या काही दिवसांपूर्वी मी रत्नागिरी SP मोहित कुमार गर्ग यांच्यावर आरोप केले होते. CBI ची एक टीम रत्नागिरी मध्ये 3 दिवसासाठी दाखल झाली, दौऱ्याची माहिती मिळताच SP यांना कोरोना झाला. काही झालं तरी संबंधित यंत्रणेकडे मी माहिती देणार. पण SP आहात म्हणून मनमानी चालणार नाही.”, असं ट्विट निलेश राणेंनी केलंय. सध्या सीबीआयची टीम रत्नागिरी दौऱ्यावर असताना निलेश राणे यांनी पोलीस अधीक्षकांविरोधात घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवरही निशाणा

निलेश राणे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जापान दौऱ्याची आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या स्विझर्लंड दौऱ्याची तुलना करत जोरदार टीका केली. ‘मोदी साहेबांचा जपानचा दौरा 48 तासाचा होता. 48 तासात जवळपास 28 मीटिंग करून पहाटे 4 वाजता भारतात पोहोचले आणि 11 वाजता भारत सरकारची कॅबिनेट पार पाडली. प्रदूषण मंत्री आदित्य ठाकरे PR team मार्फत स्विझर्लंडला 2 इंटरव्ह्यू द्यायला गेला तिथून आराम करायला लंडनला गेला. हा फरक आहे’, अशी टीका निलेश राणे यांनी केलीय.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.