AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामाला कुणीच हायजॅक करु शकत नाही : दानवे

औरंगाबाद : “रामाला कुणी हायजॅक करु शकत नाही, राम हा आम जनतेचा आहे”. असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर केले. “राम हा काँग्रेसचा नाही, ना भाजपचा, ना शिवसेनेचा तो या देशातील आम जनतेचा आहे”. असेही ते म्हणाले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. राम मंदिर लवकरात लवकर बांधण्यात […]

रामाला कुणीच हायजॅक करु शकत नाही : दानवे
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM
Share

औरंगाबाद : “रामाला कुणी हायजॅक करु शकत नाही, राम हा आम जनतेचा आहे”. असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर केले.

“राम हा काँग्रेसचा नाही, ना भाजपचा, ना शिवसेनेचा तो या देशातील आम जनतेचा आहे”. असेही ते म्हणाले.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत. राम मंदिर लवकरात लवकर बांधण्यात यावं यासाठी हा अयोध्या दौरा करण्यात आला. ठाकरेंनी आज सकाळी कुटुंबासह रामलल्लाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली, जिथे त्यांनी या दौऱ्याचा मूळ उद्देश स्पष्ट केला. तसेच त्यांनी भाजपला राम मंदिर बांधण्याचा अल्टिमेटमही दिला.

ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहेत. यावर राजकीय नेते वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच रावसाहेब दानवे यांनी अयोध्या यात्रेवरून शिवसेनेवर निशाणा साधला.

“भाजप लवकरच राम मंदिर बांधेल, त्यासाठी आमचे प्रयत्नही सुरू आहेत. कायदा करण्यासाठी अडचणी येतात, हे खासदार संजय राऊय यांना माहित आहे. राज्यसभेत आमची संख्या नसल्याने विशेष कायदा करण्यास अडथळा येतो आहे. त्यासाठी किमान दोन तृतीयांश संख्या असणे गरजेचे आहे”. असेही दानवे म्हणाले.

“दोन्ही पक्षाने एकत्र आले पाहिजे आणि नक्कीच रामाचे दर्शन घेऊन आल्यावर शिवसेनेत बदल होईल”, असा टोलाही यावेळी दानवेंनी लगावला.

राजकीय वर्तुळात ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेच्या या दौऱ्यामुळे भाजपाची चांगली गोची झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेमुळे राम मंदिरच्या राजकारणाला एक नवे वळण आले आहे.

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.