AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा […]

राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 23, 2019 | 9:28 PM
Share

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलाय. त्यांनी यावेळी जवळपास साडे चार लाखांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली. तर जळगावचे भाजप उमेदवार उन्मेश पाटील यांनीही 4 लाख 10 हजाराच्या फरकाने विजय मिळवला.

शिवसेना आणि भाजपने अनुक्रमे 23 आणि 25 जागांवर उमेदवार उतरवले होते. भाजपने सर्वाधिक यश मिळवत 23 उमेदवार विजयी झाले आहेत. तर फक्त दोन उमेदवारांचा पराभव झाला. बारामतीमधून कांचन कुल आणि चंद्रपुरातून हंसराज अहिर यांचा पराभवाचा सामना करावा लागला. बारामतीत भाजपने अगोदरपासूनच विजयाचा दावा केला होता, पण सुप्रिया सुळेंनी एकतर्फी विजय मिळवला.

केंद्रीय मंत्र्याचा पराभव

केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेले हंसराज अहिर यांचा काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी पराभव केला. काँग्रेसला राज्यात चंद्रपूरची एकमेव जागा जिंकता आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत सर्वांचा पराभव झालाय. त्यात चंद्रपूरमध्ये आश्चर्यकारक विजय मिळाला, ज्यात केंद्रीय मंत्र्यांचाच पराभव झाला.

बारामतीत एकतर्फी लढत

2014 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने सुप्रिया सुळेंची दमछाक केली होती. पण यावेळी सुप्रिया सुळेंनी सहज विजय मिळवला. भाजपने बारामतीत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मोठं आव्हान निर्माण करण्यात यश आलं असलं तरी सुप्रिया सुळेंनी बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवलंय.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ