AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा […]

राज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 23, 2019 | 9:28 PM
Share

मुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद हा मतदारसंघ गमावलाय. पण कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये त्याची भरपाई झाली आहे. अनेक उमेदवारांनी लाखोंच्या फरकाने विजय मिळवला आहे. भाजपचे उत्तर मुंबईचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी यावेळीही सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम केलाय. त्यांनी यावेळी जवळपास साडे चार लाखांच्या फरकाने प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात केली. तर जळगावचे भाजप उमेदवार उन्मेश पाटील यांनीही 4 लाख 10 हजाराच्या फरकाने विजय मिळवला.

शिवसेना आणि भाजपने अनुक्रमे 23 आणि 25 जागांवर उमेदवार उतरवले होते. भाजपने सर्वाधिक यश मिळवत 23 उमेदवार विजयी झाले आहेत. तर फक्त दोन उमेदवारांचा पराभव झाला. बारामतीमधून कांचन कुल आणि चंद्रपुरातून हंसराज अहिर यांचा पराभवाचा सामना करावा लागला. बारामतीत भाजपने अगोदरपासूनच विजयाचा दावा केला होता, पण सुप्रिया सुळेंनी एकतर्फी विजय मिळवला.

केंद्रीय मंत्र्याचा पराभव

केंद्रीय गृहराज्यमंत्री असलेले हंसराज अहिर यांचा काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी पराभव केला. काँग्रेसला राज्यात चंद्रपूरची एकमेव जागा जिंकता आली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत सर्वांचा पराभव झालाय. त्यात चंद्रपूरमध्ये आश्चर्यकारक विजय मिळाला, ज्यात केंद्रीय मंत्र्यांचाच पराभव झाला.

बारामतीत एकतर्फी लढत

2014 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात भाजपने सुप्रिया सुळेंची दमछाक केली होती. पण यावेळी सुप्रिया सुळेंनी सहज विजय मिळवला. भाजपने बारामतीत संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मोठं आव्हान निर्माण करण्यात यश आलं असलं तरी सुप्रिया सुळेंनी बालेकिल्ला शाबूत ठेवण्यात यश मिळवलंय.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...