AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : ‘कितीही वाईट माणूस असेल, पण त्याच्याकडे…’, काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

PM Narendra Modi : "देशात जी रिजनल पॉलिटिकल एस्पिरेशन आहे. त्याला सन्मान मिळाला पाहिजे. तसं नॅशनल पॉलिटिक्स व्हावं. कोणतीही मोठी राजकीय पार्टी असो. त्यांनी प्रादेशिक पक्षाला तेवढंच मोठं स्थान दिलं पाहिजे. आमच्यासोबत कोणी आलं तर त्यांना आम्ही सोबत घेत आहोत" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi : 'कितीही वाईट माणूस असेल, पण त्याच्याकडे...', काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 03, 2024 | 9:24 AM
Share

“घराणेशाही पक्ष आणि लोकशाहीवादी पक्ष यात फरक असतो. मला माझ्या पक्षाचा विस्तार करायचा आहे. माझ्या ज्या आयडिया आहेत, त्याच्याशी कोणी जोडले जात असेल, तर त्यांना आम्ही सोबत घेतो. नवा विचार आणि प्रवाह जर आम्ही येऊ दिला नाही, तर आम्ही सुद्धा संकुचित होऊ शकतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ‘टीव्ही 9 मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांच्यासह TV9 ग्रुपच्या पाच व्यवस्थापकीय संपादकांनी मुलाखत घेतली. त्यात पंतप्रधान मोदींनी हे म्हटलं. “आम्हाला प्रत्येकवेळी मैदानात राहिलं पाहिजे. एसीत राहिलो असं चालत नाही. भाजप फायदा करेल असं वाटतं, त्यांचं स्वागत आहे. कितीही वाईट माणूस असेल त्याच्याकडेही काही तरी देण्यासारखं असतं, त्यांना आम्ही सोबत घेण्याचा प्रयत्न करतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

आघाडीच्या मुद्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केलं. “आघाडीला निवडणुकीपुरतं मर्यादित ठेवू नका. देशात विविधता आहे. आपली फिलॉसॉफी काय आहे? देशात जी रिजनल पॉलिटिकल एस्पिरेशन आहे. त्याला सन्मान मिळाला पाहिजे. तसं नॅशनल पॉलिटिक्स व्हावं. कोणतीही मोठी राजकीय पार्टी असो. त्यांनी प्रादेशिक पक्षाला तेवढंच मोठं स्थान दिलं पाहिजे. आमच्यासोबत कोणी आलं तर त्यांना आम्ही सोबत घेत आहोत. आमच्याकडे बहुमत असतानाही टीडीपी आणि शिवसेना आमच्यासोबत होती. रिजनल पार्टीची लढाई राज्यात असते. त्यांची रणनीती स्टेटच्या हिशोबाने होते. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जातो. आम्हाला राज्याचं भलं हवं असतं. आम्ही काँग्रेससारखा अहंकार ठेवत नाही. आम्ही सर्वांना घेऊन जात असतो” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

अनेक वर्षानंतर ही मोठी रॅली झाली

“फायदा, नफ्यासाठी आम्ही युती करत नाही. ती आमची फिलॉसॉफी नाही. प्रॅक्टिकल गोष्ट असेल, तर करतो. मी आंध्रप्रदेशात मोठी रॅली केली. चंद्राबाबू होते. अनेक वर्षानंतर ही मोठी रॅली झाली होती. तेव्हाच जाणवलं परिवर्तनाच्या मूडमध्ये लोक आहेत. लोकसभेत स्थिर सरकार हवं असं त्यांना वाटतं. दोन विभागात हे मतदार विभागले होते. एक म्हणजे राज्यात परिवर्तन करणं आणि दुसरं म्हणजे लोकसभेत सरकारला किती मजबूत करायचं” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.