AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Narendra Modi : ‘देशाच्या पंतप्रधानांचा गळा घोटण्याचा…’, अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदींच मोठं वक्तव्य

PM Narendra Modi : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी एक मोठ वक्तव्य केलं. "देशवासियांनी आम्हाला देशासाठी पाठवलय. पक्षासाठी पाठवलेलं नाही. हे सभागृह पक्षासाठी नाही, देशासाठी आहे. 140 कोटी देशवासियांसाठी हे सभागृह आहे" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi : 'देशाच्या पंतप्रधानांचा गळा घोटण्याचा...', अधिवेशन सुरु होण्याआधी पंतप्रधान मोदींच मोठं वक्तव्य
narendra modi
| Updated on: Jul 22, 2024 | 11:21 AM
Share

“मी हे दु:खाने बोलतोय, 2014 नंतर काही खासदार पाच वर्षांसाठी आले, काही १० वर्षांसाठी आले. पण असे बरेच खासदार होते, ज्यांना आपल्या मतदारसंघासाठी बोलण्याची संधी मिळाली नाही. आपल्या विचारांना संसेदत समृद्ध करण्याची संधी मिळाली नाही. कारण काही पक्षांच्या नकारात्मक राजकारणामुळे देशच्या संसेदचा महत्त्वपूर्ण वेळ, एक प्रकारे आपलं राजकीय अपयश झाकण्यासाठी दुरुपयोग केला” अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.

“मी सर्व पक्षांना आग्रह करतो की, कमीत कमी जे खासदार पहिल्यांदा संसदेत निवडून आलेत, त्यांना संधी द्या, त्यांना त्यांचे विचार व्यक्त करु द्या लोकांना पुढेच यायची संधी द्या” असं अपील पंतप्रधान मोदी यांनी केलं. तुम्ही पाहिलं असेल नवीन संसद स्थापन झाल्यानंतर पहिलं सत्र होतं. 140 कोटी देशवासियांनी बहुमताने ज्या सरकारला सेवा करण्याचा आदेश दिला. त्याच आवाजाला चिरडण्याचा, अलोकतांत्रिक प्रयत्न झाला. अडीच तास देशाच्या पंतप्रधानांचा गळा घोटण्याचा, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. लोकशाही व्यवस्थेत अशा गोष्टींना स्थान नाही. ज्यांनी हे केलं, त्यांना याचा पश्चाताही नाहीय. मनात वेदना सुद्धा नाहीयत. देशवासियांनी आम्हाला देशासाठी पाठवलय. पक्षासाठी पाठवलेलं नाही. हे सभागृह पक्षासाठी नाही, देशासाठी आहे. 140 कोटी देशवासियांसाठी हे सभागृह आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

‘नकारात्मक विचार वाईट असतात’

“सर्व खासदार पूर्ण तयारीनिशी चर्चेला समृद्ध करतील. कितीही विरुद्ध विचार असतील, विरुद्ध विचार वाईट नसतात, नकारात्मक विचार वाईट असतात. देशाला नकारात्मकतेची आवश्यकता नाही. देशाला एका विचारधारेची, प्रगती विकास विचारधारेची, देशाला नव्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या विचारधारेची आवश्यकता आहे. लोकशाहीच्या या मंदिराचा सामन्यात माणसाच्या आशा, अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सकारात्कम उपयोग करु” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.