AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘स्वातंत्र्याची भीक नको’ म्हणालेल्या नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण! वाचा काय असतो होलोग्राम पुतळा?

Netaji Subhash chandra Bose : इंडिया गेटवर बसवण्यात आलेल्या या पुतळ्याच्या अनावरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनही केलं. यावेळी त्यांनी नेताजींच्या देशप्रेमाबद्दल वक्तव्य करताना त्यांच्या कार्याला अभिवादनही केलं.

'स्वातंत्र्याची भीक नको' म्हणालेल्या नेताजींच्या होलोग्राम पुतळ्याचं अनावरण! वाचा काय असतो होलोग्राम पुतळा?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम पुतळा
| Edited By: | Updated on: Jan 23, 2022 | 7:27 PM
Share

नवी दिल्ली : दिल्लीत आज (रविवार, 23 जानेवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम (Netaji Subhash Chandra Bose Hologram Statue) पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. इंडिया गेटवर बसवण्यात आलेल्या या पुतळ्याच्या अनावरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधनही केलं. यावेळी त्यांनी नेताजींच्या देशप्रेमाबद्दल वक्तव्य करताना त्यांच्या कार्याला अभिवादनही केलं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज 125वी जयंती असून त्यानिमित्त या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, यानंतर आपत्ती व्यवस्थापनातील योगदानाबद्दल देण्यात येणारा नेताजी सुभाषचंद्र बोस पुरस्काराचंही वितरण करण्यात आलं आहे. यावेळी संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच नेताजींचा भव्य पुतळा उभारला जाईल, असं आश्वासन दिलं. त्याचप्रमाणे नेताजींनी स्वातंत्र्यासाठी कधीच इंग्रजांपुढे भीक मागितली नाही, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.

होलोग्राम पुतळा म्हणजे काय?

होलोग्राम हे एक प्रकारचं डिजिटल तंत्रज्ञान आहे. ते एका प्रोजेक्टरप्रमाणे काम करतं. या तंत्रज्ञानाचा वापर करुन थ्री डी आकृती तयार करता येते. या तंत्रज्ञानामुळे आभासी प्रतिकृती तयार होते. ही प्रतिकृती जिवंत पुतळ्यासारखी असल्याचाच भास होतो. होलोग्राम पुतळा हे आधुनिक तंत्रज्ञानानं साकारलेलं एक अद्भूत रसायन आहे.

लवकरच खराखुरा पुतळा उभारणार

दरम्यान, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचं जरी आज अनावरण करण्यात आलं असलं तरिही लवकरच त्यांच्या ग्रॅनाईट पुतळ्याचंही काम सुरु करण्यात येणार नाहे. ग्रॅनाईट दगडापासून तब्बल 28 फूट इतका भव्य पुतळा लवकरच नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा साकरला जाईल, असंही मोदींनी आजच्या या कार्यक्रमात म्हटलंय. 1968 साली हटवण्यात आलेल्या जॉर्ज पंचम यांच्या पुतळ्याच्या जागी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा होलोग्राम पुतळा सध्या साकारण्यात आला आहे.

पुरस्कारांचं वितरण

2019, 2020, 2021 आणि 2022 या वर्षांसाठीच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या योगदानातील महत्त्वपूर्ण बोस पुरस्कारांचंही वितरण यावेळी करण्यात आलं. यावेळी आपल्या भाषणाची सुरुवात करता मोदींनी नेताजींच्या कार्याला नमन केलं. नेतांजींनी एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द आणि प्रेरणा काय असते, हे आपल्याला शिकवलं, असंही मोदींनी म्हटलंय. स्वातंत्र्य मला भीक म्हणून नको आहे, मी ते मिळवेन, अशा ठाम मताचे नेताजी होते, असंही मोदी म्हणालेत. सरकारनं नेताजींची जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्याचं ठरवलं आहे, असं देखील यावेळी मोदींनी जाहीर केलं.

संबंधित बातम्या :

‘बाळासाहेब असते तरी महाविकास आघाडीचा प्रयोग झाला असता!’, अशोक चव्हाणांचा दावा

‘बाळासाहेब असते तर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झालीच नसती’, सुधीर मुनगंटीवारांकडून सेनेला डिवचण्याचा प्रयत्न

मोठी राजकीय अपडेट! मुंबई पालिकेसाठी भाजप मनसेसोबत युती करणार? फॉर्म्युलाही ठरला?

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.