AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्याला ठार मारणार का? लेकीसह ‘मातोश्री’वर आलेल्या चिंताग्रस्त शेतकऱ्याचा पोलिसांना सवाल

कर्जाने अडचणीत आलेला पनवेल जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शाळेय शिक्षण घेणाऱ्या मुलीसह आपली कैफियत मांडण्यासाठी मातोश्रीवर आले (Police action against Farmer with daughter).

शेतकऱ्याला ठार मारणार का? लेकीसह 'मातोश्री'वर आलेल्या चिंताग्रस्त शेतकऱ्याचा पोलिसांना सवाल
| Updated on: Jan 05, 2020 | 2:52 PM
Share

मुंबई : कर्जाने अडचणीत आलेला पनवेल जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शाळेय शिक्षण घेणाऱ्या मुलीसह आपली कैफियत मांडण्यासाठी मातोश्रीवर आले (Police action against Farmer with daughter). त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा करायची होती. मात्र, मातोश्रीमध्ये प्रवेश करताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी संबंधित शेतकऱ्याने पोलीस शेतकऱ्याला ठार मारणार का? असा प्रश्नही उपस्थित केला (Police action against Farmer with daughter).

पनवेलमधील शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले होते. मात्र, बराच वेळ होऊनही भेट होत नसल्याने त्यांनी मातोश्रीच्या आत जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवत मुख्यमंत्र्यांना भेटता येणार नाही, असं स्पष्ट केलं. तसेच पोलीस गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. याला शेतकऱ्याने विरोध केला. अखेर पोलिसांनी मुलीसह शेतकऱ्याला ताब्यात घेतलं. संबंधित शेतकऱ्याला चौकशीसाठी खैरवाडी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले.

विशेष म्हणजे पोलिसांनी संबंधित शेतकऱ्याला माध्यमांसमोर आपली अडचण आणि प्रश्न मांडू देण्यासही मज्जाव केला. यावर संबंधित शेतकऱ्याने पोलीस शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवणार आहेत का असा सवाल केला. मात्र, पोलिसांनी काहीही न ऐकता त्यांना जबरदस्तीने पोलीस स्टेशनमध्ये नेले. त्यामुळे या शेतकऱ्याची संपूर्ण बाजू समजू शकलेली नाही.

“शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही. अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून योग्य ती कारवाई करण्यात येईल. मातोश्री बाहेर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असं आश्वासन नवे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे.

मातोश्रीवर मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला लेकीसह ताब्यात घेतल्यानंतर नवनियुक्त कृषिमंत्री दादा भुसे यांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नेहमीच शेतकऱ्यांची चिंता राहिली आहे. शेतकऱ्यांना सुखी ठेवणं हेच मुख्यमंत्र्याचं ध्येय आहे. मुख्यमंत्री लवकरच शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी प्रयत्न करतील.” यावेळी दादा भुसे यांनी शेतकरी प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांनी थोडा वेळ द्यावा, अशी विनंती केली.

Follow Us
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.