AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आंदोलनातील गुन्ह्यांप्रकरणी मराठा तरुणांना पोलिसांच्या नोटीस

औरंगाबाद : मराठा आंदोलनप्रकरणी औरंगाबादमधील मराठा तरुणांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मराठा आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्याप्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांशी संबंधितच या नोटीस आहेत. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील 80 टक्के गुन्हे मागे घेतल्याचे सांगितले होते. तसेच उर्वरीत गुन्हेही मागे घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात […]

मराठा आंदोलनातील गुन्ह्यांप्रकरणी मराठा तरुणांना पोलिसांच्या नोटीस
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM
Share

औरंगाबाद : मराठा आंदोलनप्रकरणी औरंगाबादमधील मराठा तरुणांना पोलिसांनी नोटीस बजावल्या आहेत. मराठा आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ झाली होती. त्याप्रकरणांमध्ये दाखल गुन्ह्यांशी संबंधितच या नोटीस आहेत. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलकांवरील 80 टक्के गुन्हे मागे घेतल्याचे सांगितले होते. तसेच उर्वरीत गुन्हेही मागे घेऊ, असे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात नोटीस आल्याने मराठा तरुणांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या नोटीस आल्यानंतर मराठा तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे. संबंधित मराठा तरुणांना रस्ता अडवणे, जाळपोळ करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे याप्रकरणी नोटीस दिल्या आहेत. यात या तरुणांना त्यांच्यावर दंडाची आकारणी व इतर कायदेशीर कारवाई का करु नये, अशीही विचारणा केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांचे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन पूर्ण न केल्याची भावना मराठा समाजकडून व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले?

“मराठा आंदोलनावरील 80 टक्के केसेस मागे घेण्यात आल्या आहेत. उर्वरीत केसेसही लवकरच मागे घेतल्या जातील. त्यासाठी काही न्यायालयीन प्रक्रिया आहे, ती पूर्ण केल्यावर केसेस मागे घेण्यात येतील.”, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना दिले होते.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

“संभाजी भिडे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यायला 10 वर्षे लागली आहेत. सकल मराठा क्रांती मोर्चा आणि भीमा कोरेगाव वेळी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, गुन्हे मागे घेण्याची एक मोठी प्रक्रिया असते हे समजून घ्यावे.” असे महसूलमंत्री चंद्रकांत  पाटील यांनी सांगलीत म्हटले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे दोघेही मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची भाषा बोलत होते. मात्र, प्रत्यक्षात मराठा तरुणांना थेट नोटीस येत असल्याने मराठा समाजात असंतोषाचे वातावरण आहे.

संबंधित बातम्या : मराठा आंदोलकांवरील 80 टक्के केस मागे, उर्वरीतही मागे घेऊ : मुख्यमंत्री

व्हिडीओ पाहा:

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.