AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Train Mishap | राजकारणातील दिग्गज नेत्यांकडून श्रद्धांजली

मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली (Political Leaders tweet on Aurangabad Train Mishap) आहे.

Aurangabad Train Mishap | राजकारणातील दिग्गज नेत्यांकडून श्रद्धांजली
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: May 08, 2020 | 12:23 PM
Share

औरंगाबाद : मालवाहू ट्रेनखाली चिरडून 16 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली (Political Leaders tweet on Aurangabad Train Mishap) आहे. रात्रीच्या वेळेस रेल्वे रुळावरच विश्रांती घेण्यासाठी झोपलेल्या मजुरांचा पहाटेच्या सुमारास करुण अंत झाला. औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात एमआयडीसीच्या निर्माणाधीन पुलाजवळ ही दुर्घटना घडली. या घटनेवर राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गजांनी शोक व्यक्त (Political Leaders tweet on Aurangabad Train Mishap) करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत मृत मजुरांना श्रद्धांजली वाहिली आहे.

“औरंगाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातातील जीवितहानीमुळे अत्यंत दुख: होत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी या अपघाता संबंधित बोललो असून ते परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. आवश्यक सर्व सहकार्य दिले जात आहे”, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

“औरंगाबाद येथील रेल्वे अपघातामुळे झालेल्या जीवितहानीने खूप दु: ख झाले. माझी प्रार्थना मजुरांच्या कुटुंबियांसोबत आहेत”, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

“मालवाहू रेल्वेखाली मजुरांचा चिरडून मृत्यू झाल्याच्या बातमीने धक्का बसला आहे. आपण आपल्या राष्ट्र निर्माण करणाऱ्या मजुरांसोबत चुकीचा व्यवहार केल्याची लाज वाटली पाहिजे. मृत मजुरांच्या कुटुंबासाठी मी दुख: व्यक्त करतो आणि सर्व जखमी झालेल्या मजुरांसाठी प्रार्थना करतो,” असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले.

“औरंगाबाद रेल्वे अपघाताबद्दल ऐकून धक्का बसला. या अपघाताबद्दल मी दुख: व्यक्त करतो. मृत मजुरांच्या कुटुंबासोबत आहे”, असं ट्वीट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे झालेल्या रेल्व अपघाताबद्दल ऐकून मी दु:खी आहे. हा एक धक्कादायक अपघात आहे. मी मृत मजुरांच्या कुटुंबासोबत आहे. जखमी मजूर लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रभू श्री राम यांच्याकडे प्रार्थना करतो, असं ट्वीट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

सर्व राजकीय वर्तुळातून या घटनेवर शोक व्यक्त केला जात आहे. तर काहींनी मजुरांना  आवाहन केलं की, गावाकडे जाण्याची सोय केली जात आहे. कुणीही जीव धोक्यात धालून प्रवास करु नये.

नेमकं काय झालं?

औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते. रात्री थकल्यावर रेल्वे बंद असल्याचा विचार करुन मजुरांनी रुळावरच झोप घेतली असावी, असा अंदाज आहे.

पहाटे 6.30 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या मालवाहू रेल्वेखाली हे मजूर चिरडले गेले. मालगाडीने 19 मजुरांना धडक दिली. यामध्ये 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण जखमी आहेत. यामध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. एमआयडीसीच्या निर्माणाधीन पुलाजवळ ही दुर्घटना घडली.

मजुरांची घरची वाट

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक स्थलांतरित मजूर परराज्यात अडकले आहेत. विशेष ट्रेन किंवा बसच्या माध्यमातून या मजुरांना आपापल्या राज्यात नेण्याची व्यवस्था हळूहळू केली जात आहे. देशाच्या विविध भागातून श्रमिक एक्सप्रेस निघाल्या आहेत.

भूक, पैशांची कमतरता, कोरोनाची भीती आणि कुटुंबाची ओढ अशा विविध कारणांमुळे धीर सुटलेल्या मजुरांनी आधीच आपल्या घरची वाट धरली होती. काही जण हजारो किलोमीटर आणि कित्येक दिवसांच्या प्रवासानंतर घरी पोहोचले, तर कोणाला वाटेतच प्राण सोडावे लागल्याच्या करुण कहाण्या समोर आल्या आहेत.

संबंधित बातम्या :

Aurangabad Train Mishap | मजुरांनो, धीर सोडू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन, औरंगाबादेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख

औरंगाबादमध्ये रुळावर झोपलेल्या 16 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून करुण अंत

Aurangabad Train Mishap | औरंगाबादच्या जीवघेण्या रेल्वे ट्रॅकवर नेमकं काय घडलं?

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा