अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी कधी मिळणार?; प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं

लोकसभेत सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. हे जे सगळं काही चाललंय ते काही नाही.

अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी कधी मिळणार?; प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्टच सांगितलं
ajit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 1:49 PM

नागपूर | 27 जुलै 2023 : अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चांनीही जोर धरला आहे. राष्ट्रवादीचे मंत्री आणि आमदारांनीही अजित पवार हे भविष्यातील मुख्यमंत्री असल्याची विधान केली आहेत. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांनी अधिकच जोर धरला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवर अजित पवार यांनी काहीच भाष्य केलेलं नाही. त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचं गूढ अधिकच वाढलं आहे. त्यातच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाष्य करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

प्रफुल्ल पटेल मीडियाशी संवाद साधत होते. आज ती जागा रिकामी नाही. मग चर्चा कशाला करता? अजितदादा महाराष्ट्रातील वजनदार लोकप्रिय नेते आहेत. आमच्या पक्षाचं नेतृत्व करत आले आहेत. काम करणाऱ्यांना कधी ना कधी, आज ना उद्या, उद्या ना परवा संधी मिळतच असते. अनेक लोकांना मिळाली. अजित पवारांना आज ना उद्या संधी मिळेलच. आम्हीही त्या दिशेने काम करत आहोत, असं सूचक विधान प्रफुल्ल पटेला यांनी केलं आहे. त्यामुळे अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला.

हे सुद्धा वाचा

ताकदीने प्रयत्न करू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थर्ड टर्म मिळावी म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमचा पक्ष काही दिवसांपूर्वी एनडीएमध्ये सहभागी झाला आहे. त्यामुळे आम्ही सगळे जेवढे ताकदीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरी टर्म मिळवण्यासाठी लढणार आहोत, असं पटेल यांनी सांगितलं.

एवढं सोप्पं नाही

भारत दहाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आलेला आहे. आपला जीडीपी आहे, येणाऱ्या पाच वर्षात नक्कीच विश्वास तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो आणि त्यासाठी एक स्थिर चांगलं, विकासशील सरकारची गरज आहे. आज देशात ज्याप्रमाणे राजकारण चाललेलं आहे, म्हणजे कालपर्यंत आम्ही होतो म्हणून काही टीका करायचं कारण नाही. पण जे काही आपल्याला दिसत आहे, वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे विचारधारा आणि एवढ्या साऱ्या लोकांना एकत्र आणणं ही काही सोपी गोष्ट नाही, असंही त्यांनी सांगितलं.

ती काळाची गरज

एक चांगलं स्थिर सरकार आणि या सरकारच्या चेहरा असला पाहिजे. त्या चेहऱ्यावर लोकांचा विश्वास असला पाहिजे. ही आज काळाची गरज आहे. म्हणून आम्ही पण निर्णय घेतला, अनेक बाबतींचा विचार करून निर्णय केला. मागच्या काही दिवसांमध्ये आज जे इंडिया म्हणतात त्यांच्या मीटिंगमध्ये मला जाण्याचा एकदा प्रसंग आला. त्यावेळी अनेक पक्षाचे आणि वेगवेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले होते. पण त्यांच्यात विश्वासहार्यता प्रस्थापित करू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

अविश्वास ठराव पारित होऊ शकत नाही

लोकसभेत सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. हे जे सगळं काही चाललंय ते काही नाही. 30 वर्ष संसदेत अविश्वास प्रस्ताव आलेले आहेत. नो कॉन्फिडन्स मोशन कितपत यशस्वी होतात हे सगळ्यांना माहिती आहे. यावेळी लोकसभेचे आकडे आहेत.

त्या आकड्याच्या आधारावर कुठल्याही परिस्थितीत अविश्वास मग ठराव पारित होऊ शकत नाही. कारण भाजपचे स्वतःचे 300 च्यावर सदस्य आहेत. अविश्वास प्रस्ताव आणणे म्हणजे लोकांच्या डोळ्यात धुळ फेकणे आहे. त्याला काही अर्थ नाही. सगळ्यांना माहिती आहे. यांनाही माहिती आहे की त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.