AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंमत असेल तर अटक करुन दाखवा : प्रकाश आंबेडकर

"अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा", असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Aambedkar Protest against CAA and NRC) पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.

हिंमत असेल तर अटक करुन दाखवा : प्रकाश आंबेडकर
| Edited By: | Updated on: Dec 26, 2019 | 4:51 PM
Share

मुंबई : “अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Aambedkar Protest against CAA and NRC) पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज (26 डिसेंबर) नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसवर टीका (Prakash Aambedkar Protest against CAA and NRC) केली.

“या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारनेच पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझा समावेश असल्याचा आरोप केला होता. आता हिम्मत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.

“भाजप, आरएसएस देशात अराजकता माजवत आहे. हा कायदा 40 टक्के हिंदूंविरोधात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इथल्या भटक्या, आदिवासी, कुणबी तसेच अर्थव्यवस्थेविरुद्ध डफडी वाजवली असती, तर आम्हाला वेगळी डफडी वाजवायला लागली नसती”, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

“ज्याच्याकडे जमीन त्याच्याकडे कागदपत्र, जमीन नाही त्याच्याकडे कागदपत्र नाहीत, बाप कुठे मेला, पंजोबा कुठे मेला माहित नाही. मग कागदपत्र कसली मागता”, असा सवालही यावेळी त्यांनी भाजप सरकारला विचारला.

“जो यांना विरोध करणार त्याचे नागरिकत्व यांना काढायचे आहे. त्यानंतर हे मताचे अधिकार काढून घेणार. हे विचार करुन जाणीवपूर्वक सुरु आहे. हा कायदा फक्त इथल्या हिंदूंविरोधी असून मुस्लीमविरोधी असल्याचे भासवले जात आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“मुंबईतील लोकांसाठी डिटेंशन सेंटर दोन ठिकाणी आहेत. एक खारघरमध्ये आहे, तर दुसरे नेरुळ येथे आहे. खारघरमधील डिटेंशन सेंटरमध्ये कमीत कमी दोन लाख लोक राहतील एवढी मोठी जागा आहे. जे सरकारविरोधी ओरडतील त्यांच्यासाठी हे सेंटर तयार केले आहेत”, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.