AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हिंमत असेल तर अटक करुन दाखवा : प्रकाश आंबेडकर

"अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा", असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Aambedkar Protest against CAA and NRC) पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.

हिंमत असेल तर अटक करुन दाखवा : प्रकाश आंबेडकर
| Edited By: | Updated on: Dec 26, 2019 | 4:51 PM
Share

मुंबई : “अरे हिंमत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Aambedkar Protest against CAA and NRC) पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात आज (26 डिसेंबर) नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेसवर टीका (Prakash Aambedkar Protest against CAA and NRC) केली.

“या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारनेच पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात माझा समावेश असल्याचा आरोप केला होता. आता हिम्मत असेल तर मला अटक करुन दाखवा”, असं आव्हान प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले.

“भाजप, आरएसएस देशात अराजकता माजवत आहे. हा कायदा 40 टक्के हिंदूंविरोधात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने इथल्या भटक्या, आदिवासी, कुणबी तसेच अर्थव्यवस्थेविरुद्ध डफडी वाजवली असती, तर आम्हाला वेगळी डफडी वाजवायला लागली नसती”, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

“ज्याच्याकडे जमीन त्याच्याकडे कागदपत्र, जमीन नाही त्याच्याकडे कागदपत्र नाहीत, बाप कुठे मेला, पंजोबा कुठे मेला माहित नाही. मग कागदपत्र कसली मागता”, असा सवालही यावेळी त्यांनी भाजप सरकारला विचारला.

“जो यांना विरोध करणार त्याचे नागरिकत्व यांना काढायचे आहे. त्यानंतर हे मताचे अधिकार काढून घेणार. हे विचार करुन जाणीवपूर्वक सुरु आहे. हा कायदा फक्त इथल्या हिंदूंविरोधी असून मुस्लीमविरोधी असल्याचे भासवले जात आहे”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

“मुंबईतील लोकांसाठी डिटेंशन सेंटर दोन ठिकाणी आहेत. एक खारघरमध्ये आहे, तर दुसरे नेरुळ येथे आहे. खारघरमधील डिटेंशन सेंटरमध्ये कमीत कमी दोन लाख लोक राहतील एवढी मोठी जागा आहे. जे सरकारविरोधी ओरडतील त्यांच्यासाठी हे सेंटर तयार केले आहेत”, असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला.

Follow Us
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.