AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकर राज्यपालांच्या भेटीला, राष्ट्रपती शासन टाळण्यासाठी ‘हा’ पर्याय सुचवला

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar meet Governor) यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली आहे.

प्रकाश आंबेडकर राज्यपालांच्या भेटीला, राष्ट्रपती शासन टाळण्यासाठी 'हा' पर्याय सुचवला
| Updated on: Nov 07, 2019 | 7:05 PM
Share

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar meet Governor) यांनी राजभवन येथे जाऊन राज्यपालांची भेट घेतली. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी (Prakash Ambedkar meet Governor) राज्यपालांची भेट घेत त्यांच्याशी सध्याच्या राजकीय स्थितीविषयी चर्चा केली. तसेच त्यांना काही पर्याय सुचवले. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांना या चर्चेविषयी माहिती दिली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “ज्या दिवशी शपथविधी होतो तो दिवस विधीमंडळाचा पहिला दिवस मानला जातो. त्यामुळे आम्ही राज्यपालांशी चर्चा केली. मागीलवेळी 8 नोव्हेंबरला शपथविधी झाला होता. तो कार्यकाळ उद्या (8 नोव्हेंबर) संपत आहे. त्यामुळे आज रात्री किमान सरकार स्थापन झालं पाहिजे. अन्यथा 4-5 निवडणून आलेल्या विधीमंडळ सदस्यांचा शपथविधी तरी घ्यावा लागेल. त्यानंतरच सभागृह गठित झालं असं म्हणता येईन. या दोन्ही गोष्टी होणार नसतील, तर 356 कलमानुसार राष्ट्रपती शासन लागू करावे लागेल. त्याला पर्याय राहणार नाही.”

संविधानच्या कलम 172 नुसार विधीमंडळ सुरूच असतं. मात्र, हे विधीमंडळ सुरू राहण्यासाठी दर 5 वर्षांनी निवडणूक होते आणि सदस्य निवडले जातात. विधीमंडळाचं काम सुरू राहावं म्हणून निवडणुका होतात. त्यामुळे आधीच्या आमदारांच्या शेवटच्या दिवशीच नव्या आमदारांचा शपथविधी झाला, तरच विधीमंडळ सुरू राहिल. अन्यथा राष्ट्रपती शासन लागू करावं लागणार आहे. असं होऊ नये म्हणून राज्यपालांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली.

यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी 2014 मधील ज. वि. पवार यांच्या याचिकेचाही संदर्भ दिला. ते म्हणाले, “2014 मध्ये ज. वि. पवार यांनी एक दिवस उशिराने शपथविधी होत असल्याने याचिका दाखल केली होती. त्यानंतर शिवाजी पार्कवर दोन सदस्य आणि प्रोटीम स्पिकर यांचा शपथविधी झाला.”

Follow Us
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.