Abhijeet Dipke: 2029 पर्यंत सरकार…. अभिजीत दीपकेच्या भवितव्याबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान; अखेर विषय संपवून टाकला!

Abhijeet Dipke: कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके हा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याची पार्टी आता पुढे काय पाऊल उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना एका बड्या नेत्याने केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Abhijeet Dipke: 2029 पर्यंत सरकार.... अभिजीत दीपकेच्या भवितव्याबाबत बड्या नेत्याचं मोठं विधान; अखेर विषय संपवून टाकला!
Abhijeet Dipke
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 02, 2026 | 3:31 PM

कॉकरोच जनता पार्टीने नीट पेपरफुटी प्रकरणी जंतर मंतर येथे आंदोलन केले. त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजिनाम्याची मागणी केली. सीजेपीचे हे आंदोलन यशस्वी झाले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजिनामा झाला. त्यानंतर सीजेपीचा संस्थापक अभिजीत दीपके हा चांगलाच चर्चेत आला. आता सीजेपीच्या भविष्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठे विधान केले आहे. त्यांच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी अभिजीत दीपकेच्या भविष्याबाबत स्पष्ट मत मांडलं आहे. ते म्हणाले, ‘2029 ला सरकार बदलणं हे अभिजित दीपकेला राहुल गांधी असे पर्यत शक्य होणार नाही’ असे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

वाचा: अभिजीत दीपकेला परदेशात शिक्षण घेण्यासाठी कोणी दिली पैसे?

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याविषयी काय म्हणाले?

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही कोर्टात याला चॅलेंज करणार आहोत. मुंबई हाय कोर्टात याला चॅलेंज करू. जुन्या काळात भांडण होतं होतं. एक वर्ग विष्णूला मानणारा होता दुसरा रामाला मानणारा होता. रामायण, महाभारत ज्यांनी काढलं त्यांच्या विरोधात याचिका दाखल झाली होती. कुठल्या देवाने कुठल्या देवा समोर झुकले पाहिजे यावरून याचिका दाखल झाली होती. बड्या मुश्किलीने ती याचिका दाबण्यात आली होती. नेमकं कुणी कुणासमोर झुकावे हा विषय होता.

“घराणेशाही श्रीमंताचा पक्ष”

पुढे ते म्हणाले की, पक्षांतर्गत निवडणुका दुर्मिळ व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे घराणेशाही श्रीमंताचा पक्ष असल्याचं पाहिला मिळत आहे. कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही म्हणून कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी ही निवडणूक आहे. अध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार आहेत. १२ कार्यकारिणी सदस्यसाठी २५ उमेदवार रिंगणात आहेत. मतदानसाठी सक्रिय कार्यकर्ता हितचिंतक आणि कार्यकर्ता अशा लोकांना मतदानाचा अधिकार होता. ३० जुलैला मतदान पार पडलं आहे. दुपारी साडे तीन वाजता निकाल जाहीर होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us