AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेसाठी शिफारस केलेली 12 नावे लवकर जाहीर करा, अन्यथा… : पृथ्वीराज चव्हाण

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 12 नावांच्या शिफारस यादीचा राज्यपालांनी आदर केला पाहिजे, असे चव्हाण म्हणाले

मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेसाठी शिफारस केलेली 12 नावे लवकर जाहीर करा, अन्यथा... : पृथ्वीराज चव्हाण
| Updated on: Nov 15, 2020 | 4:07 PM
Share

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विधानपरिषदेसाठी 12 सदस्यांच्या नावांची शिफारस यादी (Vidhan Parishad MLC List) राज्यपालांना दिली आहे. नावांची घोषणा लवकरात लवकर करावी, अन्यथा याचा संदेश बाहेर चुकीचा जाऊ शकतो, असं मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी व्यक्त केलं. (Prithviraj Chavan says Governor should announce Vidhan Parishad MLC List suggested by CM quickly)

राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्याकडे 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस करण्यात आली आहे, याविषयी पृथ्वीराज चव्हाण यांना विचारण्यात आले. “राज्यघटनेप्रमाणे विधानपरिषदेमध्ये 12 सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्याच्या मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांना असतो. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी 12 नावांची शिफारस यादी राज्यपाल यांना दिली आहे. या शिफारसीचा राज्यपालांनी आदर केला पाहिजे” असे चव्हाण म्हणाले.

“राज्यपाल नियुक्त बारा जणांच्या नावांची घोषणा लवकरात लवकर केली पाहिजे. यामध्ये उशीर झाला तर यात राजकारण होत आहे, असा चुकीचा संदेश जाऊ शकतो. राजकीय नेत्यांनी काहीही सांगितलं असलं तरी राज्यपालांनी राज्यघटनेचा आदर केला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे” असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.

महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी 6 नोव्हेंबरला देण्यात आली होती. 15 दिवसांत राज्यपालांनी दिलेल्या यादीतील नावं जाहीर करावीत, अशी शिफारस ठाकरे सरकारकडून करण्यात आली. म्हणजेच 21 नोव्हेंबरपर्यंत राज्यपालांना नावावर निर्णय घ्यावा लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने मुदतीची शिफारस करून राज्यपालांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, केंद्राप्रमाणे राज्यातही संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचा निर्णय राज्यपालांवर बंधनकारक आहे. विधानपरिषदेवर कोणाला घ्यायचं हे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरवतं आणि त्या नावांची यादी राज्यपालांकडे देतं. राज्यपालांना 167 कलमाखाली सल्ला देता येतो, माहिती विचारता येते किंवा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करता येते. पण मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांनी घेतलेला निर्णय बदलता येत नाही, अशी माहिती घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी दिली होती. राज्यपालांनी किती वेळात निर्णय घ्यायचा हे लिहिलेलं नाही. पण त्यांनी जास्त वेळ लावणं चुकीचं आहे, असं मतही उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे.

12 सदस्यांमध्ये कोणाची नावं?

काँग्रेस

1) सचिन सावंत – सहकार आणि समाजसेवा 2) रजनी पाटील – सहकार आणि समाजसेवा 3) मुजफ्फर हुसैन – समाजसेवा 4) अनिरुद्ध वनकर – कला

राष्ट्रवादी काँग्रेस

(Prithviraj Chavan says Governor should announce Vidhan Parishad MLC List suggested by CM quickly)

1) एकनाथ खडसे – सहकार आणि समाजसेवा 2) राजू शेट्टी – सहकार आणि समाजसेवा 3) यशपाल भिंगे – साहित्य 4) आनंद शिंदे – कला

शिवसेना

1) उर्मिला मातोंडकर – कला 2) नितीन बानगुडे पाटील – 3) विजय करंजकर – 4) चंद्रकांत रघुवंशी –

संबंधित बातम्या :

राज्यपाल नियुक्त 12 जागांचा तिढा वाढला, ठाकरे सरकारकडून 15 दिवसांच्या मुदतीची शिफारस

विधानपरिषद : राष्ट्रवादीच्या यादीत खडसे, शेट्टी, आनंद शिंदेंचं नाव, शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, नितीन बानुगडे

(Prithviraj Chavan says Governor should announce Vidhan Parishad MLC List suggested by CM quickly)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.