AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या 97 टक्के जागांवर काँग्रेसचा पराभव

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. एकीकडे एनडीए सत्तास्थापनेचा दावा करत असताना, काँग्रेसमध्ये मात्र मतभेदाचे वातावरण दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियांका गांधी यांची महासचिवपदी नियुक्ती केली होती. अवघ्या काही महिन्यापूर्वी राजकारणात सक्रीय झालेल्या प्रियांका यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचा जोरदार प्रचार केला. मात्र प्रियांका यांनी प्रचार केलेल्या […]

प्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या 97 टक्के जागांवर काँग्रेसचा पराभव
| Updated on: May 25, 2019 | 5:56 PM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झाले आहे. एकीकडे एनडीए सत्तास्थापनेचा दावा करत असताना, काँग्रेसमध्ये मात्र मतभेदाचे वातावरण दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियांका गांधी यांची महासचिवपदी नियुक्ती केली होती. अवघ्या काही महिन्यापूर्वी राजकारणात सक्रीय झालेल्या प्रियांका यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचा जोरदार प्रचार केला. मात्र प्रियांका यांनी प्रचार केलेल्या 97 टक्के जागांवर काँग्रेसला दारुण पराभव स्विकारावा लागला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्याच्या तीन महिन्यांपूर्वी काँग्रेसने प्रियांका गांधी यांना राजकारणात सक्रीय केलं होतं. काँग्रेसच्या महासचिवपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रियांका यांनी लोकसभेची जोरदार तयारी केली. लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रियांका यांनी 38 प्रचारदौरे केले. यात मध्यप्रदेश, दिल्ली, झारखंड, हरियाणा या ठिकाणी 12 प्रचार दौऱ्याचं आयोजन केलं होतं. तर एकट्या उत्तरप्रदेशात प्रियांका यांचं 26 प्रचारदौऱ्यांचं आयोजन केलं होतं. मात्र प्रियांका गांधींनी प्रचार केलेल्या उत्तरप्रदेशात काँग्रेसला केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

उत्तरप्रदेश हे राज्य निवडणुकीतील महत्त्वाचे ठिकाण मानलं जातं. देशात एकूण 543 लोकसभा मतदारसंघ आहेत. यातील सर्वाधिक 80 मतदारसंघ हे एकट्या उत्तरप्रदेशात आहेत. त्यामुळे केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी उत्तरप्रदेश हे महत्त्वाचे ठिकाण मानलं जातं. या लोकसभा क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसी मतदारसंघ, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर मतदारसंघ, गांधी किंवा नेहरू परिवाराचा पारंपारिक अमेठी आणि रायबरेली मतदारसंघाचा यात समावेश होतो. याच कारणामुळे अनेक राजकीय नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीपूर्वी, निवडणुकीदरम्यान उत्तरप्रदेशाचा दौरा करतात.

यंदाही अनेकांनी निवडणुकीदरम्यान उत्तरप्रदेशाचा दौरा केला होता. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी यांसारख्या अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. काँग्रेसच्या महासचिवपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर प्रियांका गांधी यांनी उत्तरप्रदेशात 26 प्रचारदौरे केले. प्रियांका यांच्या प्रचारदौऱ्यानंतर काँग्रेसचा विजय होईल असे अनेकांना वाटत होते, मात्र प्रियांका यांच्या प्रचारदौऱ्यानंतर काँग्रेसला अनेक ठिकाणी पराभव स्विकारावा लागला आहे.

लोकसभा निवडणूक 2019 च्या निकालाची मतमोजणी संपल्यानंतर अंतिम निकालाची संपूर्ण आकडेवारी निवडणूक आयोगाने  घोषित केली. यानुसार भाजपप्रणित एनडीएने 352 जागा मिळवत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेसला केवळ 52 जागांवर विजय मिळाला.

लोकसभा निवडणुक 2014 मध्ये काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. यामध्ये त्यात वाढ झाली असली, तरी स्वत: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचाच अमेठीत पराभव झाला. राहुल गांधी दोन जागेवर उभे होते, त्यापैकी केरळमधील वायनाड इथे त्यांचा मोठा विजय झाला. तर सोनिया गांधी यांचा उत्तरप्रदेशातील रायबरेली मतदारसंघात विजय झाला आहे. काँग्रेस संपूर्ण उत्तरप्रदेशात जवळपास 67 जागांवर लढली होती. मात्र यातील केवळ एकाच रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळाला आहे. बाकी 66 मतदारसंघात काँग्रेसला पराभव स्विकारावा लागला आहे.  यामुळे काँग्रेसने निवडणुकीपूर्वी काढलेला हुकमी एक्का फेल ठरल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?