AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar : अजित पवार नेहमी योग्य आणि खरंच बोलतात; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

Jayant Patil on Ajit Pawar : आमच्याकडे आमदारांची भरपूर संख्या आहे. सगळे आमदार आमच्याच संपर्कात आहेत. प्रत्येक आमदार आम्हाला सांगतो की, जे काही झालं हे चुकीचं झालं आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. शरद पवार साहेबांसोबत आहोत, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar : अजित पवार नेहमी योग्य आणि खरंच बोलतात; जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Sep 30, 2023 | 1:41 PM
Share

पुणे | 30 सप्टेंबर 2023 : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयावर अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते असताना आपली भूमिका मांडली होती. हे वक्तव्य आता अजित पवारांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. त्यांचं हे वक्तव्य शरद पवार गट आता निवडणूक आयोगाकडे देण्याच्या तयारीत आहे. राष्ट्र्वादीच्या पक्ष आणि चिन्हावर शरद पवार आणि अजित पवार गटाने दावा केला आहे. याबाबत येत्या सहा ऑक्टोबरला सुनावणी आहे. त्या पार्शभूमीवर अजित पवार यांचं जुनं वक्तव्य चर्चेत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काही आमदार एका बाजूला गेले आणि त्यांनी म्हटलं पक्ष आमचा तर त्यांना पक्ष किंवा चिन्ह देणं योग्य आहे का?, अजित पवार म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा होतेय. जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जो व्हीडिओ सध्या चर्चेत आहे. त्या व्हीडिओमध्ये अजित पवार असं सांगत आहेत की मनसेचा एक सदस्य गेला तर मनसे पक्ष त्याच्यासोबत जाईल का? तर अजितदादांचं हे विधान योग्यच आहे. अजित पवार नेहमीच खरं आणि योग्य बोलतात. अजित पवारांची भूमिका देखील निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावी, असं जयंत पाटील म्हणालेत. तसंच त्यांनी भाजपच्या स्टॅटर्जीवरही भाष्य केलंय.

येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप काही आमदारांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा होतेय. यावर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात जे नेते नको वाटतात. त्यांना दिल्लीला पाठवण्याची प्रथा भाजपमध्ये आहे. त्यातलाच हा एक भाग आहे. त्याचमुळे या नेत्यांना लोकसभा निवडणुकीत या नेत्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होतेय, असं जयंत पाटील म्हणालेत.

आमदार अपात्रतेबाबत लवकर निर्णय व्हायला हवा. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लागतील. या सर्व आमदारांना पैलतीरी पोहोचवण्याचं काम राहुल नार्वेकर करत आहेत. हे ठरवून केलं जात आहे का? राहुल नार्वेकर योग्य तो निर्णय करतील. पण त्यांनी निर्णय लवकर घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे, असंही जयंत पाटील म्हणालेत.

दसरा मेळाव्याच्या सभेसाठी शिवाजी पार्क मैदान उद्धव ठाकरे यांना मिळायला पाहिजे. त्यांची ती परंपरा आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेक वर्षांपासून तिथे दसरा मेळावा करतात. सरकार त्यांना नक्की परवानगी देईल असा मला विश्वास आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.