AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Radhakrishna Vikhe Patil : काँग्रेसनं स्वाभिमान कधीच गहाण टाकला, केवळ अर्थप्राप्तीसाठी महाविकास आघाडीत; विखे पाटलांचा घणाघात

राधाकृष्ण विखे पाटील आज शिर्डीत साईंच्या दर्शनाला आले होते. यावेळी राज्यात आलेल्या नवीन सरकारचे त्यांनी अभिनंदन केले. लोकांच्या आमच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील, असे म्हटले.

Radhakrishna Vikhe Patil : काँग्रेसनं स्वाभिमान कधीच गहाण टाकला, केवळ अर्थप्राप्तीसाठी महाविकास आघाडीत; विखे पाटलांचा घणाघात
राधाकृष्ण विखे पाटील (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 13, 2022 | 4:59 PM
Share

शिर्डी, अहमदनगर : महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) काँग्रेसला नगण्य स्थान होते. फक्त अर्थप्राप्तीसाठी काँग्रेसचे मंत्री महाविकास आघाडीमध्ये होते. काँग्रेसने आपला स्वाभिमान कधीच गहाण टाकला आहे. काँग्रेसला राज्यात पूर्णपणे अनुल्लिखित करण्यात आले होते, अशी घणाघाती टीका भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते शिर्डीत बोलत होते. गुरूपोर्णिमा उत्सवाच्या (Guru Purnima) निमित्ताने त्यांनी आज शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्राला लोकांचे सरकार मिळाले असून जनतेच्या अपेक्षा वाढल्याचे राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले. मागील अडीच वर्षात राज्याची अधोगती झाली. महाविकास आघाडी सरकार म्हणजे विश्वासघाताने आलेले सरकार होते, अशी टीकादेखील विखे पाटील यांनी केली.

‘साईबाबांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शक्ती द्यावी’

राधाकृष्ण विखे पाटील आज शिर्डीत साईंच्या दर्शनाला आले होते. यावेळी राज्यात आलेल्या नवीन सरकारचे त्यांनी अभिनंदन केले. लोकांच्या आमच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होतील. कोविडचा संपूर्ण नायनाट व्हावा, राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी साईबाबांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शक्ती द्यावी, त्यांना आशीर्वाद द्यावा, अशी साई चरणी प्रार्थना त्यांनी केली. तर महाविकास आघाडी सरकारवर टीकही केली. विश्वासघात करून आलेले सरकार आता पडले आहे. या सरकारमध्ये कुणाचाच कुणाला ताळमेळ नव्हता. तर काँग्रेस दुर्लक्षित होती. महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊन काँग्रेसने आपला स्वाभिमान गहाण टाकला, अशी टीका त्यांनी केली.

‘नव्या सरकारचे प्रशासनावर नियंत्रण’

नव्या सरकारचे अभिनंदन करताना ते म्हणाले, की आता राज्याला सक्षम असे सरकार मिळाले आहे. राज्यात पूरसदृश्य परिस्थिती आहे. मात्र यंत्रणा सतर्क, प्रशासन जागरूकतेने काम करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनावर योग्य नियंत्रण आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची प्रक्रिया होत राहील. हे काम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना करू द्या, असे ते यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीसह यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावरही टीका केली. शरद पवारांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोला त्यांनी लगावला.

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?

Follow Us
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका
धनंजय मुंडेच्या हातात आता 2-3 महिनेच... करुणा मुंडेच्या दाव्याने राजका.
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच..
ठाकरे खरंच फडणवीसांना भेटले होते का? अंबादास दानवेंनी अखेर सांगितलंच...
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील गोळीबारामागे नेमका कुणाचा हात? मोठी अपडेट स.
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण
गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी कृत्य, नंतर जे घडलं त्याची कल्पना करणं कठीण.
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो...
फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात, मोबाईलमधील त्या संशयास्पद फोटो....
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार
मोठी घडामोड! भोंदू खरातला मदत करणाऱ्या बड्या अधिकाऱ्यावर होणार कडक कार.
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट...
मोठी बातमी! भाजपमध्ये पक्षप्रवेश करताच राघ चड्ढांना धक्का, थेट....
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर
कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होताच राऊत संतापले, भाजपला सुनावले खडे.
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव
काळजाचा ठोका चुकवणारी घटना! विमान टॅक ऑफ करणार इतक्यात.. थोडक्यात बचाव.